मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:38 IST2026-05-14T13:19:49+5:302026-05-14T13:38:13+5:30
राजस्थानमधील नीट पेपरफुटी प्रकरणात आता कौटुंबिक आणि कोचिंग नेटवर्कबाबात मोठे खुलासे होत आहेत. ज्या कुटुंबातील मुलांची गेल्या वर्षी एमबीबीएससाठी निवड झाली होती, त्याच कुटुंबातील सदस्यांवर आता पेपर खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे.

मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
राजस्थानमधील नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या एका कुटुंबावर, पेपर विकत घेऊन आपल्या मुलाला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी आता तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
जामवारामगड येथील बिवल कुटुंब अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या नेटवर्कमध्ये सामील असू शकते, असे उघड झाले आहे. परिणामी, तपास आता फक्त या वर्षीच्या पेपरफुटीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मागील वर्षांच्या निवड प्रक्रिया आणि नेटवर्कचीही तपासणी केली जात आहे.
एकाच कुटुंबातील पाच जण एमबीबीएसला
६ नोव्हेंबर, २०२५ रोजीची एक सोशल मीडिया पोस्ट आता तपास यंत्रणांसाठी एक मोठा पुरावा ठरली आहे. या पोस्टमध्ये, आरोपी दिनेश बिवलने आपल्या कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. डॉक्टर बनल्याबद्दल त्याने मुलांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी, परिसरात या कुटुंबाची खूप चर्चा झाली होती आणि लोकांनी याला कठोर परिश्रम आणि यशाची गोष्ट म्हटले होते. पण आता, तीच पोस्ट तपास यंत्रणांसमोर नवीन प्रश्न निर्माण करत आहे. एसओजीच्या सूत्रांनुसार, नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात आता कुटुंबातील तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मंगिलाल बिवल, दिनेश बिवल आणि एमबीबीएसचा विद्यार्थी विकास बिवल यांचा समावेश आहे. सीबीआयने या तिघांनाही दिल्लीला नेले आहे.
मुलासाठी प्रश्नपत्रिका विकत घेतली होती
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बिवल यांचा मुलगा, ऋषी बिवल, यावेळी नीट परीक्षा देत होता. त्याच्यासाठी अंदाजे ३० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही प्रश्नपत्रिका गुरुग्रामहून आणण्यात आली होती. नंतर, तीच प्रश्नपत्रिका सीकरमधील इतर विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. ऋषी बिवलने कथितरित्या इतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकण्यास सुरुवात केल्याचे समोर आले. दरम्यान, आता ऋषी फरार झाल्याचे वृत्त आहे.