शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:37 IST

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली.

कुवेतमधील मंगाफ शहरात लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४५ भारतीय वंशाचे होते. मृतांमध्ये सर्वाधिक २४ जण केरळचे, पाच तामिळनाडूचे, तीन उत्तर प्रदेश, एक झारखंड आणि दोन जण बिहारचे आहेत. उत्तर प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात गोरखपूरमधील दोन जणांचा समावेश आहे. एक गुलारियाचा जयराम गुप्ता आणि दुसरा गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जैतपूर उत्तरेतील रहिवासी अंगद गुप्ता. 

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जटेपूर उत्तर येथील रहिवासी अंगद गुप्ता हे ९ वर्षांपूर्वी कुवेतला गेले होते आणि तेथील एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून कामाला होते. मंगफ शहरात गुरुवारी लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दूतावासातून आलेल्या फोनवरून हा प्रकार समोर आला आणि तेव्हापासून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

"मन लावून अभ्यास करा..."

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, मन लावून अभ्यास करा असा सल्लाही दिला. सध्या या घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. .

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंगद यांचे धाकटे भाऊ पंकज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह यापुढे कसा करणार हा प्रश्न पडला आहे. 

मुलीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी 

कुटुंबीयांनी राज्य व केंद्र सरकारकडे मृतदेह सुखरूप परत आणावा तसेच कुटुंबातील मोठी मुलगी अंशिका हिला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मृत अंगद गुप्ता यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी यांच्यासह मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मुलगा आशुतोष गुप्ता आणि धाकटा मुलगा सुमित गुप्ता यांचा समावेश आहे.

मृतदेह पोहोचले भारतात 

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान केरळमधील कोची विमानतळावर उतरलं आहे. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकूण ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची येथे उतरलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश