शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या 5 वर्षांत 6 लाख भारतीयांनी स्वीकारलं विदेशी नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:16 IST

गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - देशातील 6 लाख नागरिकांनी गेल्या 5 वर्षात भारताचे नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. मंगळवारी सरकारनेच लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत माहिती दिली. विदेश मंत्रालयाजवळ असलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात वास्तव्यास आहेत. 

विदेशात असलेल्या 1 कोटी 33 लाख नागरिकांपैकी 2017 मध्ये 1,33,049 नागरिकांनी, 2018 मध्ये 1,34,561 लोकांनी, सन 2019 मध्ये 1,44,017 जणांनी, 2020 मध्ये 85,248 नागरिकांनी आणि 2021 मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 1,11,287 भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील तब्बल 6 लाख नागरिकांनी विदेशी नागरिकत्व स्विकारत इंडियाला गुड बाय केलं आहे. 

गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. भारतीय नागरिकत्वतेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये 227 अमेरिकेचे, 7782 पाकिस्तानचे, 795 अफगाणिस्तानचे आणि 184 बांग्लादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. मंत्री राय यांनी सांगतिले की, सन 2016 मध्ये 1106 जणांना भारतीय नागरिकता प्रदान करण्यात आली. तर 2017 मध्ये 817, 2018 मध्ये 628, 2019 मध्ये 987 लोकांना आणि 2020 मध्ये 639 जणांना भारत देशाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतParliamentसंसद