शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मोदी सरकारच्या 5 वर्षांत 6 लाख भारतीयांनी स्वीकारलं विदेशी नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 10:13 AM

गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - देशातील 6 लाख नागरिकांनी गेल्या 5 वर्षात भारताचे नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. मंगळवारी सरकारनेच लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत माहिती दिली. विदेश मंत्रालयाजवळ असलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात वास्तव्यास आहेत. 

विदेशात असलेल्या 1 कोटी 33 लाख नागरिकांपैकी 2017 मध्ये 1,33,049 नागरिकांनी, 2018 मध्ये 1,34,561 लोकांनी, सन 2019 मध्ये 1,44,017 जणांनी, 2020 मध्ये 85,248 नागरिकांनी आणि 2021 मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 1,11,287 भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील तब्बल 6 लाख नागरिकांनी विदेशी नागरिकत्व स्विकारत इंडियाला गुड बाय केलं आहे. 

गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. भारतीय नागरिकत्वतेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये 227 अमेरिकेचे, 7782 पाकिस्तानचे, 795 अफगाणिस्तानचे आणि 184 बांग्लादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. मंत्री राय यांनी सांगतिले की, सन 2016 मध्ये 1106 जणांना भारतीय नागरिकता प्रदान करण्यात आली. तर 2017 मध्ये 817, 2018 मध्ये 628, 2019 मध्ये 987 लोकांना आणि 2020 मध्ये 639 जणांना भारत देशाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतParliamentसंसद