शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर धुमसतेच, मृतांची संख्या २१ : मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प

By admin | Updated: July 11, 2016 04:23 IST

रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत

श्रीनगर : काश्मीरमध्ये अतिरेकी बुऱ्हान वनी मारला गेल्यानंतर उसळलेला हिंसाचार अद्याप सुरूच आहे. रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसदृश स्थिती आहे. तर मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनीला मारल्यानंतर सतत दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले. काश्मीरमध्ये अनेक भागातून हिंसाचाराचे वृत्त आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पुलवामा शहरात नेवा येथे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झाला. यात १८ वर्षांचा इरफान अहमद मलिक हा तरुण गंभीर जखमी झाला. येथे एका हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एका अज्ञात व्यक्तीला गंभीर अवस्थेत येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा येथे मृत्यू झाला. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात एका वाहनाला झेलम नदीत ढकलून देण्यात आले. यात पोलीस चालक फिरोज अहमद यांचा मृत्यू झाला. पुलवामा जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलला गोळ्या घालण्यात आल्या. तर दमहाल हांजीपुरातील एका ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. अनंतनाग जिल्ह्यात अचबल भागात एका पोलीस चौकीवर जमावाने हल्ला केला. या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन तरुण जखमी झाले आहेत. आणखी एक तरुण श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर गोळी लागून जखमी झाला आहे. तर शनिवारी रात्री हिंसाचारात जखमी झालेल्या चार जणांचा मृृत्यू झाला. जमावाने तीन सरकारी कार्यालये, पीडीपीच्या एका आमदाराच्या घराला आणि काही वाहनांना आग लावली. भाजपाच्या एका कार्यालयालाही जमावाने लक्ष्य केले. सय्यद अली शाह गिलानी, मीरवैज उमर फारुक यांच्यासह फुटीरवादी नेते अद्यापही नजरकैदेत आहेत. मोहम्मद यासीन मलिकला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहे. (वृत्तसंस्था)हिजबुल मुजाहिदीनच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारून भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप रविवारी पाकिस्तानने केला. काश्मीर प्रश्न केवळ तेथील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असल्याचे मान्य केले तरच सोडवला जाणे शक्य आहे, असेही पाकने म्हटले. निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या सततच्या हत्यांचा पाक कठोरपणे निषेध करतो. काश्मिरी नेते बुऱ्हान वाणी व असंख्य निष्पाप काश्मिरींची हत्या ही खेदजनक व निषेधार्थ असून, त्यामुळे काश्मिरींच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते. हत्यांमुळे जम्मू आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाला रोखता येणार नाही, असे त्यात म्हटले.गृहमंत्र्यांची मेहबूबांशी चर्चा नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, काश्मीरमधील स्थितीबाबत अर्धा तास चर्चा झाली. मेहबूबा यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. त्यानंतर राजनाथसिंह यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.यात्रा स्थगित जम्मू : काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले की, ही यात्रा रविवारीही बंद होती. जम्मूूहून आज नवा जथा पाठविण्यात आला नाही. तथापि, काश्मीरहून आधार शिबिरातून यात्रा सुरू आहे.