शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
2
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
4
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
5
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
6
लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...
7
video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...
8
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
9
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका
10
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
11
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
12
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
13
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
14
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
15
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
16
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
17
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
18
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
19
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
20
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

काश्मीर धुमसतेच, मृतांची संख्या २१ : मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प

By admin | Published: July 11, 2016 4:23 AM

रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत

श्रीनगर : काश्मीरमध्ये अतिरेकी बुऱ्हान वनी मारला गेल्यानंतर उसळलेला हिंसाचार अद्याप सुरूच आहे. रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसदृश स्थिती आहे. तर मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनीला मारल्यानंतर सतत दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले. काश्मीरमध्ये अनेक भागातून हिंसाचाराचे वृत्त आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पुलवामा शहरात नेवा येथे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झाला. यात १८ वर्षांचा इरफान अहमद मलिक हा तरुण गंभीर जखमी झाला. येथे एका हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एका अज्ञात व्यक्तीला गंभीर अवस्थेत येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा येथे मृत्यू झाला. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात एका वाहनाला झेलम नदीत ढकलून देण्यात आले. यात पोलीस चालक फिरोज अहमद यांचा मृत्यू झाला. पुलवामा जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलला गोळ्या घालण्यात आल्या. तर दमहाल हांजीपुरातील एका ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. अनंतनाग जिल्ह्यात अचबल भागात एका पोलीस चौकीवर जमावाने हल्ला केला. या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन तरुण जखमी झाले आहेत. आणखी एक तरुण श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर गोळी लागून जखमी झाला आहे. तर शनिवारी रात्री हिंसाचारात जखमी झालेल्या चार जणांचा मृृत्यू झाला. जमावाने तीन सरकारी कार्यालये, पीडीपीच्या एका आमदाराच्या घराला आणि काही वाहनांना आग लावली. भाजपाच्या एका कार्यालयालाही जमावाने लक्ष्य केले. सय्यद अली शाह गिलानी, मीरवैज उमर फारुक यांच्यासह फुटीरवादी नेते अद्यापही नजरकैदेत आहेत. मोहम्मद यासीन मलिकला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहे. (वृत्तसंस्था)हिजबुल मुजाहिदीनच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारून भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप रविवारी पाकिस्तानने केला. काश्मीर प्रश्न केवळ तेथील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असल्याचे मान्य केले तरच सोडवला जाणे शक्य आहे, असेही पाकने म्हटले. निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या सततच्या हत्यांचा पाक कठोरपणे निषेध करतो. काश्मिरी नेते बुऱ्हान वाणी व असंख्य निष्पाप काश्मिरींची हत्या ही खेदजनक व निषेधार्थ असून, त्यामुळे काश्मिरींच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते. हत्यांमुळे जम्मू आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाला रोखता येणार नाही, असे त्यात म्हटले.गृहमंत्र्यांची मेहबूबांशी चर्चा नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, काश्मीरमधील स्थितीबाबत अर्धा तास चर्चा झाली. मेहबूबा यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. त्यानंतर राजनाथसिंह यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.यात्रा स्थगित जम्मू : काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले की, ही यात्रा रविवारीही बंद होती. जम्मूूहून आज नवा जथा पाठविण्यात आला नाही. तथापि, काश्मीरहून आधार शिबिरातून यात्रा सुरू आहे.