नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच पाहायला मिळणार आहे. इंडिया टुडेशी बोलताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधल्या सर्वच सरकारी कार्यालयांवर तिरंगा लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तिथे दोन झेंडे फडकत होते. कलम 370 हटविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, जम्मू काश्मीरमध्ये आता वेगळा झेंडा फडकणार नाही, तसेच येथील लोकांसाठी दुहेरी नागरिकत्व राहणार नाही. जम्मू-काश्मीरचं पुनर्रचना विधेयक आणून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 5:07 PM