शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:42 PM

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली,

शेतजमीन आणि संपत्तीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या घटना आपण नेहमीच पेपरात वाचतो. तर, बहिण-भावाच्या नात्यातही जमिनीच्या वादावरुन तंटा होतो. सध्याच्या काळात संपत्तीसाठी जवळच्या नात्यांमध्येही कटुता निर्माण झाली आहे. मात्र, मध्य प्रदेशमच्या बैतुल जिल्ह्यातील एका युवकाने प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिला आहे. जितेंद्र उर्फ जगदीश भारती असे या युवकाचे नाव असून तो पीडब्लूडी विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. 

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली, वयाच्या चौथ्या वर्षीच जितेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न गजपूर गावातील गंगा यादव हिच्याशी ठरवलं होतं. त्यावेळी, गंगाच्या कुटुंबीयांनी 10 एकर शेतजमिन जितेंद्रच्या नावे केली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांचा विवाह होऊ शकला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा तगादा लावला, तेव्हा जितेंद्र आपले शिक्षण पूर्ण करत होते. त्यामुळे जितेंद्र यांनी लग्नास नकार दिला. 

जितेंद्रने लग्नास नकार दिल्यानंतर गंगाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या कुटुंबातील मुलाशी लावून दिलं. तर, इकडे कालांतराने जितेंद्रचेही दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. विशेष म्हणजे या घटनेत तब्बल 45 वर्षांनी जितेंद्र यांनी गंगाच्या भावाकडे संपूर्ण 10 एकर जमीन परत केली. रजिस्टार नोंदणी कार्यालयात सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर होते. लहानपणी जितेंद्रच्या नावे करण्यात आलेल्या या 10 एकर जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे आज जवळपास 50 लाख रुपये एवढी आहे. मात्र, एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता जितेंद्रने 10 एकर जमिनी गंगाच्या कुटुंबीयांना परत दिली. जितेंद्रच्या या प्रामाणिपणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थानmarriageलग्न