शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 5:04 AM

भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

नवी दिल्ली : भारतामध्येचीनविरोधात रोष वाढल्याची झळ आता बीजिंगमध्येही जाणवू लागली आहे. चीनने पहिल्यांदाच त्रिस्तरीय चर्चेची तयारी दर्शवली आहे. भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. याबरोबरच चिनी परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय दूतावासातील अधिकाºयांना बीजिंगमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक गलवान खोºयातून मागे हटले असून, गेल्या महिनाभरात सीमेवर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे हटविण्यावर आता चर्चा सुरू होईल. चीनने अत्याधुनिक टँक, तर भारताने अत्याधुनिक रडार सीमेवर तैनात केले आहे.भारत-चीनदरम्यान गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच हिंसक झटापट झाली. त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय जगात उमटले. कोरोनाचे सावट व आशिया खंडातील अशांततेमुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारखे मोठे देशही धास्तावले. भारताने चीनला सडेतोड उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक वेगवेगळ्या चौक्यांमधून मागे हटत असले तरी युद्धसामग्री अद्याप तेथेच आहे. ज्यात प्रामुख्याने टँक, रडारचा समावेश आहे.चीनने जमवला आहे सीमेवर युद्धसाठाचीनने मोठा युद्धसाठा सीमेवर जमवला आहे. लढाऊ हेलिकॉप्टर, शस्त्रसज्ज सैनिक, बांधकाम साहित्यदेखील पँगाँग सरोवराच्या परिसरात आढळले होते. हेच साहित्य हटविण्याचा आग्रह भारताचा आहे, तरच तणाव निवळेल.च्भारताकडून आर्थिक आघाडीवरही चीनविरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. चीनसमवेत चर्चा सुरू असली तरी भारताने रशिया व जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे खरेदी करण्याचा सौदा निश्चित केला आहे. असे असले तरी चीनने युद्धसाहित्य मागे नेल्यास भारतालाही तसेच करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत