शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 18:34 IST

जम्मू-काश्मीरमधील काही जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करणाऱ्या हेग येथील 'स्थायी मध्यस्थता न्यायालयाचा' (PCA) निकाल भारताने फेटाळून लावला आहे.

सिंधू जल करारासंदर्भात (Indus Water Treaty) भारताने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील काही जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करणाऱ्या हेग येथील 'स्थायी मध्यस्थता न्यायालयाचा' (PCA) निकाल भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे की, बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेल्या तथाकथित 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन'चा (COA) १५ मे चा 'निर्णय' भारताला अजिबात मान्य नाही. या न्यायाधिकरणाला भारताने कधीही मान्यता दिली नव्हती आणि आजही भारत त्याचे सर्व निर्णय अवैध मानतो.

न्यायाधिकरणाची वैधताच भारतानं नाकारली -
जायस्वाल म्हणाले,  यापूर्वीही, बेकायदेशीर लवादाचे सर्वनिर्णय भारताने ज्या पद्धतीने फेटाळले होते, अगदी त्याच प्रमाणे आताही फेटाळत आहे. या लवादाच्या स्थापनेला भारताने कधीही मान्यता दिली नाही. यामुळे त्यांच्याद्वारे चालवली जाणारी कोणतीही प्रक्रिया किंवा निर्णय बेकायदेशीर ठरतो. याच बरोबर, सिंधू जल करार स्थगित ठेवण्याच्या भूमिकेवर भारत अद्यापही कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आला होता सिंधू जल करार -
मे २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने सिंधू जल करार स्थगित  करण्याचा निर्णय घेतला होता. जोवर सीमापार दहशतवाद पूर्णपणे संपत नाही, तोवर हा करार पूर्ववत होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने या कराराचा गैरवापर करून वाद मध्यस्थीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. कराराच्या नियमांनुसार काही मुद्द्यांचा निपटारा तटस्थ तज्ज्ञ अथवा द्विपक्षीय चर्चेतून होणे आवश्यक आहे, असे भारताचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, भरत सरकारने गेल्या वर्षीच जून महिन्यात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले होते की, मुळात या लवादाची स्थापना हेच सिंधू जल कराराचे गंभीर उल्लंघन आहे. पाकिस्तान जोवर विश्वासार्ह आणि कायमस्वरूपी दहशतवाद सोडत नाही, तोपर्यंत हा करार लागू होणार नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Rejects Hague Ruling on Indus Water Treaty; Pakistan's Next Move?

Web Summary : India rejects Hague court's ruling on Indus Water Treaty, deeming it illegal. Cites Pakistan's terrorism support, suspending the treaty until cross-border terrorism ceases. India insists bilateral talks, not arbitration, should resolve disputes.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCourtन्यायालयWaterपाणीTerrorismदहशतवाद