शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भारत सरकारच्या रणनीतीनं पाकिस्तानची झोप उडाली; तालिबानशी जवळीक डोकेदुखी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:04 IST

भारत आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या बैठका धोकादायक आहेत. या बैठकीत टीटीपी आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानी एअर स्ट्राईकवर चर्चा झाली

नवी दिल्ली - २०२१ साली तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सर्वात जास्त आनंदी पाकिस्तान झाला होता. इस्लामिक देश असल्याने पाकिस्तानला फायदा होण्याची आशा होती परंतु अवघ्या ३ वर्षात परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पाकिस्तान आणि तालिबानी राजवटीच्या अफगाणिस्तानाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चाललेत. तालिबान शेजारील राष्ट्र पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशांसोबत संबंध बनवत आहे. सध्या तालिबानचा सर्वात मोठा मित्र म्हणून भारत पुढे येत आहे.

अलीकडेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांच्यासोबत दुबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर तालिबानने भारताला एक चांगला सहकारी असल्याचं म्हटलं. त्याशिवाय तालिबान मंत्र्‍याने युएईचे मंत्री अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांचीही भेट घेतली. तालिबानने या भेटीतून पाकिस्तानाला दाखवून दिले की, इस्लामिक देशांमध्ये पाकिस्तानशिवायही त्याचे अनेक मित्र आहेत. 

भारत-तालिबानची जवळीक बनली डोकेदुखी

UAE आणि सौदीला तालिबानने भेटणे पाकिस्तानसाठी चिंताजनक नाही परंतु भारत आणि तालिबान यांच्यातील जवळीक पाकिस्तानी तज्ज्ञांसाठी चिंतेची वाटते. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करतात त्याशिवाय पाकिस्तानला सतर्कतेचा इशारा देतात. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार जाण्यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचं नाव येत आहे. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. तालिबानसोबत भारत सुरुवातीपासून संपर्कात आहे. ते मोफत गहु, औषधे आणि पोलिओ व्हॅक्सिन तालिबानला देतायेत असं पाकिस्तानी तज्ज्ञांनी सांगितले.

त्याशिवाय भारत आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या बैठका धोकादायक आहेत. या बैठकीत टीटीपी आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानी एअर स्ट्राईकवर चर्चा झाली. भारताने इराणच्या चाबहार बंदर विकासावर मदतीचं आश्वासन दिले आहे. भारताला मॅनेज करणे आवश्यक आहे कारण पाकिस्तानबाबत त्यांचे धोरण आक्रमक आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या जमिनीवर एअर स्ट्राईक केले होते ज्यामुळे त्यांचे तालिबानशी संबंध खराब झाले आहेत. भारत काश्मीरवर चर्चा करू इच्छित नाही परंतु अफगाणिस्तानसोबत आपल्याला नवीन धोरण आखायला हवे असं पाकिस्तानी तज्ज्ञांनी म्हटलं.

दरम्यान, भारत अफगाणिस्तानात चीनचा वाढता प्रभाव कमकुवत करण्यासाठी तालिबानच्या जवळ जात आहे. टीटीपी आणि इस्लामिक स्टेट मिळून अफगाणिस्तानात गृहयुद्धाची परिस्थिती बनवू शकतात अशी भीती अफगाण तालिबान्यांना आहे. त्यासाठी ते टीटीपीविरोधात थेट एक्शन घेत नाहीत ज्यातून पाकिस्तानला संधी मिळेल. तालिबान केवळ आपले सरकार वाचवत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारताला हीच संधी आहे. त्यातच भारत जवळ आल्यानं पाकिस्तानवर वचक ठेवता येईल त्यामुळे तालिबानही भारताशी जवळीक वाढवत आहे असं पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्त्र नजम सेठी यांनी सांगितले. 

टॅग्स :IndiaभारतTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान