शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:42 IST

India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्काराकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमधील सीमेवरील गावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न झाले. ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये काही हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. (Pakistan attempted to engage a number of military targets in Northern and Western India)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तान लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले नव्हते. पण, पाकिस्तान लष्कराकडून जर भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. 

पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ल्याचे प्रयत्न

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ आणि ८ मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांचा समावेश आहे. 

वाचा >>भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यूएसए ग्रीड आणि हवाई संरक्षण सिस्टिमच्या मदतीने त्यांच्या मिसाईल आणि ड्रोन पाडण्यात आले. अनेक ठिकाणी पाडण्यात आलेल्या ड्रोन्स आणि मिसाईलचे सांगाडे सापडले आहेत. त्यातून पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. 

लाहोरमधील एअर डिफेन्स रडार केले निकामी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानची ठिकठिकाणची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याप्रमाणेच भारताने उत्तर दिले. जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्यात यश आले आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगतच्या गावात अंदाधूं गोळीबार केला जात आहे. यात आतापर्यंत १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. यात तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक