शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास हॉटेलच देणार नुकसान भरपाई: सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 09:08 IST

दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती.

नवी दिल्ली : गाडी चोरी होण्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास त्याची नुकसानभरपाई हॉटेलला द्यावी लागणार असल्याचे निकालात म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाने ताज हॉटेल विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या प्रकरणात दिला आहे. 

जर एखादा ग्राहक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या गाडीची चावी देत असेल आणि पार्किंगमध्ये गाडीचे संरक्षण हॉटेलच करणार आहे. यावेळी गाडी चोरी झाल्यास किंवा तिचे नुकसान झाल्यास हॉटेलच नुकसानभरपाई देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा निकाल आता आला आहे. मारुतीची झेन कार चोरीला गेली होती. न्यायालयाने तब्बल 20 वर्षांनी निकाल देत ताज हॉटेलला 2.8 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकाने ज्या स्थितीत वाहन दिले आहे त्या स्थितीत त्याला ते परत मिळायला हवे. पार्किंग मोफत दिले होते, ही सबब चालणार नाही. जर ते पार्किंग हॉटेल देत असेल तर त्या वाहनाची जबाबदारी हॉटेल प्रशासनाची राहील.

हॉटेलवाले ग्राहकांकडून रूम भाडे, एन्ट्री फी, फूड असे अनेक बाबतीत पैसे आकारतात. यामुळे कार चोरीची भरपाई हॉटेललाच द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.  

टॅग्स :carकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय