शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयी, आडवाणींसारख्या आरोपींना सर्वोच्च सन्मान - ओवेसी

By admin | Updated: May 4, 2015 15:47 IST

अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या आरोपींना मोदी सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिले असे वादग्रस्त विधान असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या आरोपींना मोदी सरकारने भारतरत्न व व पद्मविभूषण पुरस्कार दिला असे वादग्रस्त विधान असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. अशा सरकारकडून बाबरी मस्जिद प्रकरणात न्याय मिळेल अशी आशा राहिलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 

हैदराबाद येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. बाबरी मस्जिद प्रकरणात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका संशयास्पद होती. मस्जिद पाडण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेले भाषण यूट्यूबवरही सहज उपलब्ध आहे. मात्र अशाच व्यक्तींना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला आहे याकडे ओवेसींनी लक्ष वेधले. रथयात्रेच्या माध्यमातून देशभरात नुकसान  व अशांतता पसरवणा-या लालकृष्ण अडवाणींना मोदी सरकार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करत आहेत. त्यांच्यावर आजही अनेक गुन्हे दाखल आहे. ऐवढे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल असेही त्यांनी नमूद केले. ओवेसींनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच टीका केल्याने आता भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.