शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न द्या -श्रीरंग बारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:19 IST

शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केली. ते म्हणाले की, जोतीराव फुले यांचा जन्म पुण्यात झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी भारतीय समाजात परिवर्तनाची चळवळ सुरू केली.

शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य वेचले. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, विधवांवर होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठवला. घरात शाळा सुरू केली. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळेच भारतीय समाज, महिला प्रगती करू शकल्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबार्इंना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे.

शेतकºयांना मदतीसाठी चर्चा व्हावी
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी संसदेत स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी दोन गटांमध्ये शेतकºयांना मदत जाहीर केली आहे.
खरिपासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टर तर हॉर्टिकल्चर करणाºया शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दिली आहे. अनेक खासदारांना ही मदत कमी वाटते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील शेतकºयांना मदतीची विनंती केंद्राला केला.
ते म्हणाले की, गेली दोन वर्षे दुष्काळ होता. यंदा पीक चांगले आले. कापणीची वेळ आली तेव्हा पाऊस आला. पीक हातचे गेले. सोयाबीन, द्राक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे.

खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापण्याची विनंती कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केली. कोल्हापूर व नजीकच्या जिल्ह्यांमधील लोकांना प्रलंबित खटल्यांसाठी मुंबईत खेट्या माराव्या लागतात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील न्यायालयांमध्ये दहा लाख खटले प्रलंबित आहेत. याच खटल्यांच्या पुढील सुनावणीसाठी लोकांना मुंबईला खेट्या माºयावा लागतात.