शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खंडणीतील वाटेकरी होता का ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 5, 2014 16:44 IST

शिवसेना खंडणी गोळा करत होती तर भाजप गेली २५ वर्ष खंडणीतील वाटेकरी होता का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. ५ - शिवजयंतीच्या नावे हप्तावसूली करणारे शिवरायांचे वारसदार कसे अशी टीका करणा-या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना खंडणी गोळा करत होती तर भाजप गेली २५ वर्ष 
खंडणीतील वाटेकरी होता का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असली तरी शिवसेना व भाजपचे राज्यस्तरीय नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपाची मालिका सुरुच आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली होती. या टीकेला रविवारी उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौ-यात प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून भारताचा तुकडा परत कधी आणणार असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला आहे. विदर्भ विकासापासून कोसो दूर असून या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करु. मात्र विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही असे ठाकरेंनी स्पष्ट केले. सत्तेवर आल्यास महाराष्ट्र भारनियमनमुक्त करु. नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करु असे आश्वासनही त्यांनी वर्ध्यातील सभेत दिले आहे.