शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 07:59 IST

उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे.

देशभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. दिल्लीची अवस्थाही वाईट आहे. येथील तापमान ४७ अंशांवर पोहोचले आहे. उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. एका रिपोर्टनुसार, ११ ते १९ जून २०२४ दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.

उष्माघातामुळे बेघर लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, उष्णता टाळण्यासाठी पंखे. यामुळे बेघर लोकांना उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसं की थकवा, उष्माघात आणि डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेले शेल्टर अनेकदा क्षमता आणि सुविधांच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. 

सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) नावाच्या एनजीओचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमध्ये ११ ते १९ जून २०२४ दरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.' गेल्या वर्षी ११ जून ते १९ जून या कालावधीच्या तुलनेत २०२४ मधील मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे. मृतदेहांपैकी ८० टक्के मृतदेह बेघर लोकांचे आहेत.

वर्ष     मृत्यू
२०१९१४३
२०२०१२४
२०२१५८
२०२२१५०
२०२३७५
२०२४१९२

तापमान वाढण्याचे कारण काय?

वायू प्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वाढत्या तापमानामुळे बेघर लोकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हे देखील एक मोठं आव्हान आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि त्यासंबंधीचे इतर आजार होत आहेत.

याशिवाय उष्णतेमुळे जुनाट आजार आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या ऋतूत जुनाट आजार वाढतात. पैशांच्या कमतरतेमुळे, बरेच बेघर लोक सनस्क्रीन, टोपी किंवा हलके कपडे खरेदी करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून हानी पोहोचते.

भीषण परिस्थिती असूनही, बेघर लोकांना दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कायमचा पत्ता. सुनील कुमार अलेदिया म्हणाले की, अशा लोकांना फूटपाथवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. या गंभीर परिस्थितीत कुलिंग सेंटर, शेल्टर होमची व्यवस्था करणे, पाणी आणि घरं उपलब्ध करून देणं यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं लागेल.

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमान