शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 07:59 IST

उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे.

देशभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. दिल्लीची अवस्थाही वाईट आहे. येथील तापमान ४७ अंशांवर पोहोचले आहे. उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. एका रिपोर्टनुसार, ११ ते १९ जून २०२४ दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.

उष्माघातामुळे बेघर लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, उष्णता टाळण्यासाठी पंखे. यामुळे बेघर लोकांना उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसं की थकवा, उष्माघात आणि डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेले शेल्टर अनेकदा क्षमता आणि सुविधांच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. 

सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) नावाच्या एनजीओचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमध्ये ११ ते १९ जून २०२४ दरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.' गेल्या वर्षी ११ जून ते १९ जून या कालावधीच्या तुलनेत २०२४ मधील मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे. मृतदेहांपैकी ८० टक्के मृतदेह बेघर लोकांचे आहेत.

वर्ष     मृत्यू
२०१९१४३
२०२०१२४
२०२१५८
२०२२१५०
२०२३७५
२०२४१९२

तापमान वाढण्याचे कारण काय?

वायू प्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वाढत्या तापमानामुळे बेघर लोकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हे देखील एक मोठं आव्हान आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि त्यासंबंधीचे इतर आजार होत आहेत.

याशिवाय उष्णतेमुळे जुनाट आजार आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या ऋतूत जुनाट आजार वाढतात. पैशांच्या कमतरतेमुळे, बरेच बेघर लोक सनस्क्रीन, टोपी किंवा हलके कपडे खरेदी करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून हानी पोहोचते.

भीषण परिस्थिती असूनही, बेघर लोकांना दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कायमचा पत्ता. सुनील कुमार अलेदिया म्हणाले की, अशा लोकांना फूटपाथवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. या गंभीर परिस्थितीत कुलिंग सेंटर, शेल्टर होमची व्यवस्था करणे, पाणी आणि घरं उपलब्ध करून देणं यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं लागेल.

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमान