शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दाल लेकवर ‘माणुसकी’चे तरंग!

By admin | Updated: August 27, 2016 06:06 IST

धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे

श्रीनगर : धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे; पण श्रीनगरमधील हा भाजीबाजार या संचारबंदीला अपवाद आहे. येथे दाललेकमध्ये नित्यनेमाने बोटीतून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आपला दिनक्रम कायम सुरू ठेवला आहे. अर्थात त्यावर कुणाचा काही आक्षेपही नाही. कदाचित, श्रीनगरातील दाललेकवर टिकून असलेल्या माणुसकीचे हे तरंग असावेत. हिंसाचारामुळे जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड करावी लागत आहे; पण या परिस्थितीला अपवाद ठरले आहे तो येथील दाललेक. १०० वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण असलेले श्रीनगरमधील हा दाललेक या संचारबंदीच्या काळातही सकाळच्या वेळी तुम्हाला फुललेला दिसेल. तोच गजबजाट, तेच सौंदर्य, तीच धावपळ येथे बघायला मिळेल. सूर्योदयाच्या किरणांसोबत सकाळीच येथील सरोवर परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, तेव्हाच ५० हून अधिक भाज्यांच्या बोटी या दाललेकवर दाखल झालेल्या असतात. परिसरातील भाजी विक्रेत्यांचा हा दिनक्रम आहे. अवघ्या दोन तासांत भाज्या विकून अगदी ऊन्हे तापू लागण्यापूर्वीच हे भाजी विक्रेते भाजी विकून निघालेले असतात. या भाजी बाजारालाही एका शतकाची परंपरा आहे. येथील भाजी विक्रेते अब्दुल रेहमान म्हणतात की, हा बाजार संचारबंदीमुळे बंद नाही. परिसरातून नित्यनेमाने येथे भाजी विक्रेते येतात. दरम्यान, येथे सरोवरावर सकाळीच टोमॅटो, वांगे, कोबी आदी ताज्या भाज्या विक्रीसाठी येतात. (वृत्तसंस्था)>दररोज होते लाखो रुपयांची उलाढालया भाजी विक्रेत्यांचे ना दुकान आहे ना मालकीची जागा. सरोवरात भाजीची बोट घेऊन ते येतात आणि भाजी विक्री झाल्यानंतर निघून जातात. अशाच भाजी विक्रेत्यापैकी एक नजीर बट. ३५०० रुपयांची भाजी घेऊन तो येतो. त्याच्यासारख्या अनेकांचे उपजीविकेचे भाजी विक्री हे साधन आहे. थोडीथोडकी नाही, तर दररोज लाखांची उलाढाल या भाजी बाजारात होते. भाज्यांच्या ठोक विक्रीचाही हा बाजार आहे. 100वर्षांपासून असंख्य पर्यटकांचे आकर्षण असलेला दाललेक संचारबंदीतही सकाळच्या वेळी फुललेला दिसेल.>दाललेक येथे नादरू (कमल ककडी, कमळांची आतून स्वच्छ केलेली देठे, ज्याची उत्तर भारतात सर्रास भाजी बनवली जाते) विक्रीसाठी आलेल्या आशिक हुसेन यांनी सांगितले की, हे सर्व विक्रेते स्थानिक आहेत. विशेष म्हणजे या भाज्यांसाठी खतांचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे या भाज्यांची गोडी अधिक असल्याचे ते सांगतात.