शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पायपीट करत गावाकडे निघालेल्या रणवीर सिंहने अखेरच्या कॉलवर काय सांगितलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:41 IST

दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या रणवीर सिंह यांचा आग्रा येथे मृत्यू झाला.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिल्ली ते मध्य प्रदेश गावाकडे निघाला होताअनेक किमी पायी चालल्यानंतर रणवीर थकला होताछातीत दुखू लागल्याने आग्रा येथील नॅशनल हायवेवर कोसळला

नवी दिल्ली – संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचं घोषित केल्यानंतर अनेक मजुरांचे आणि कामगारांचे हाल झाले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करणं गरजेचे होतं असं सांगत पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागितली पण या लॉकडाऊनमुळे चालत गावाकडे निघालेल्या एका माणसाचा जीव गेला.

दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या रणवीर सिंह यांचा आग्रा येथे मृत्यू झाला. रणवीर सिंह दिल्लीत कुरिअर बॉयचं काम करत होते. लॉकडाऊनमुळे दिल्लीत खाणं-पिणं कठिण झाल्याने त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने गावच्या दिशेने चालत जावं लागलं. मृत्युपूर्वी रणवीरने त्याच्या सहकाऱ्यांसोबत गावी जाण्याचं ठरवलं. दिल्लीपासून फरिदाबादला पोहचलेल्या रणवीरने रात्री साडेनऊ वाजता बहीण पिंकीला कॉल केला. याबाबत पिंकीने सांगितले की, मला त्यादिवशी अचानक भावाचा फोन आला. लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं त्यामुळे मी चालत घराकडे येत आहे. सुरुवातीला हे ऐकून मला धक्का बसला. बीबीसीने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

भावाचा फोन ठेवल्यानंतर पिंकी औषध घेऊन झोपी गेली. त्यानंतर सकाळी पाचच्या सुमारास पिंकीच्या मोबाईलवर रणवीर सिंहचा फोन आला. या कॉलवरुन रणवीरने माझ्या छातीत दुखू लागलं असं सांगितले. त्यानंतर पिंकीने रणवीरला एका ठिकाणी बसण्यास सांगितले. दिल्लीहून मथुरामार्ग सकाळी आग्रा येथे पोहचला होता. पायपीट केल्यानं रणवीर थकलेला दिसून आला. रणवीरसोबत दिल्लीत एकत्र राहणारे त्याचे नातेवाईक अरविंद होते. अरविंदसोबत रणवीरने शेवटचं बोलणं केलं. अरविंद संपूर्ण रात्र रणवीरच्या संपर्कात होता. रात्रभर चालून रणवीरची तब्येत बिघडली, कोरोनाच्या भीतीने कोणीही मदतीसाठीही आलं नाही. अखेर नॅशनल हायवेवर रणवीरचा साडेसहा वाजता मृत्यू झाला.

मला फोन केला त्यावेळी रणवीरने सांगितले माझ्या छातीत दुखत आहे. मला घेण्यासाठी येणं शक्य असेल तर ये, मी त्याला बोललो की १०० नंबरवर कॉलकर कोणीतरी मदतीसाठी येईल. त्यानंतर त्याचा आवाज बंद झाला. या कॉलनंतर ८ मिनिटांनी मी पुन्हा कॉल केला त्यावेळी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला, त्याने सांगितले रणवीरची तब्येत गंभीर आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं अरविंदने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली