शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 14:23 IST

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे वास्तव्याचा आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारकडून विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेतया ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना सुखकर प्रवासापेक्षा त्रासच अधिक सहन करावा लागत आहेट्रॅकवर दिशाहीनपणे धावत असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या अंतिम स्थानकापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन-चार दिवस लावत आहेत

लखनौ - स्थलांतरीत मजुरांसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांवरून रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार सध्या आमनेसामने आले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी विशेष गाड्यांवरून राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे रेल्वे खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे.

लॉकडाऊनमुळे वास्तव्याचा आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारकडून विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना सुखकर प्रवासापेक्षा त्रासच अधिक सहन करावा लागत आहे. ट्रॅकवर दिशाहीनपणे धावत असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या अंतिम स्थानकापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन-चार दिवस लावत आहेत.

दरम्यान, स्थलांतरीत मजुरांना घेऊन गोव्यावरून उत्तर प्रदेशमधील बलियाकडे निघालेली एक श्रमिक स्पेशल ट्रेन मार्ग भरकटून नागपूरला पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जो प्रवास २८ तासांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यासाठी तब्बल ७२ तास लागल्याचे समोर आले आहे. ही ट्रेन गुरुवारी गोव्यामधून उत्तर प्रदेशमधील बलियाच्या दिशेने निघाली होती. गोवा ते बलिया हे अंतर २ हजार २४५ किमी आहे. त्यामुळे या प्रवासासाठी २८ तास लागतात. मात्र मार्ग भरकटून ही ट्रेन नागपूरला गेली त्यामुळे बलियाला पोहोचण्यासाठी ७२ तास लागले. अखेरीस तीन दिवसांच्या प्रवासानंतर ही ट्रेन बलिया येथे पोहोचली.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

दरम्यान, वारंवार मार्ग भरकटणाऱ्या रेल्वे गाड्या, ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठीच्या सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना खूप समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांची तब्येत बिघडली. अनेक राज्यांमधून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेन विशेष गाड्या धावत असल्याने या मार्गावरील ट्रॅफिक जॅम होत आहे. यापूर्वी वसईवरून निघालेली विशेष ट्रेन गोरखपूरऐवजी रुरकेला येथे पोहोचली होती.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेgoaगोवाUttar Pradeshउत्तर प्रदेशnagpurनागपूर