CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:27 AM2020-05-16T10:27:58+5:302020-05-16T10:30:36+5:30

लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

CoronaVirus news : corona community transmission risk vrd | CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

Next
ठळक मुद्देदेशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे.लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, परंतु अद्यापही समूह संक्रमणासंदर्भात परिस्थिती अस्पष्ट आहे. परंतु एका प्रख्यात आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाच्या समूह संसर्ग पसरण्याच्या जोखमीला तोंड देण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे. लॉकडाऊन काढल्यानंतर कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन (तिसरा टप्पा) आधीच सुरू झाला आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, हे ज्याच्या त्याच्या परिभाषेवर अवलंबून आहे.

...म्हणून तज्ज्ञ समूह संसर्ग शब्द टाळतात
ते म्हणाले की, ज्या लोकांनी आपण कुठेही प्रवास केलेला नाही किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नाही, अशा लोकांमध्ये हा संसर्ग दिसल्यास कोरोनाची अधिक भीती आहे. परंतु बहुतेक प्रकरणे परदेशी प्रवाशांच्या संपर्कात आल्यानं किंवा संक्रमितांच्या संपर्कात आल्यानं  झालेली आढळली आहेत. बरीच जण आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगतात. 

समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण 81970 वर पोहोचले आहे. यातील 27920 लोक संसर्गातून बरे झाले आहेत, तर 2649 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यापूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सस (एम्स) मधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग विभागाचे प्रमुख असलेले रेड्डी म्हणाले की, या जागतिक महामारीने भयानक आकार घेतला आहे, अशा प्रत्येक देशात समूह संसर्ग खरोखरच दिसून येत आहे, यावर विश्वास ठेवणे देखील आवश्यक आहे. समूह संसर्गासाठी भारतानं तयार असावे आणि प्रतिबंधासाठी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत. रेड्डी म्हणाले की, समुदायाचा प्रसार ही केवळ जोखीम नाही, तर प्रत्यक्षात हा धोका आहे.

लॉकडाऊन उघडल्यास समूह संसर्ग पसरेल
रेड्डी म्हणाले की, मलेशियासह दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये, विशेषत: भारतामध्ये दर लाख लोकांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहेत. त्याच काळात जागतिक महामारीचा प्रादुर्भाव दिसून आला. कमी वयोगटातील जास्त तरुण, ग्रामीण लोकसंख्या आणि लॉकडाऊनसारख्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे भारतात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊन उघडल्यावर काही जोखीम उद्भवू शकतात, कारण लोकांची हालचाल वाढेल आणि विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यताही वाढेल. म्हणून आम्हाला जास्तीत जास्त शारीरिक अंतर राखावे लागेल आणि सतत मास्क घालणे आणि हात धुणे या सवयींचे अनुसरण करावे लागेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

Web Title: CoronaVirus news : corona community transmission risk vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.