शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
2
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
3
Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
4
'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत
5
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
6
नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 'या' मराठी नावाची चर्चा
7
Reasi Terror Attack : दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार! 
8
Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...
9
"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
10
छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा
11
Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न
12
मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!
13
"बुमराह, आता फक्त POK राहिलाय...", IND vs PAK सामन्यानंतर हृषिकेश जोशी यांची मजेशीर पोस्ट
14
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
15
एक वृत्त आणि Suzlon Energy चा शेअर जोरदार आपटला, पाहा काय आहे कारण? 
16
खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!
17
"आता ३० मिनिटांनी भेटू.."; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली...
18
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
19
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
20
निवडणूक निकाल : Share Marketच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केली 'ही' मोठी मागणी

Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:21 PM

Lok Sabha Election 2024 Mallikarjun Kharge And Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्षांनी असं म्हटलं आहे. 

इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातील वातावरण पाहता आम्ही असं म्हणू शकतो की, इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे."

"2024 ची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. ही विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे गरिबांच्या बाजूने लढणारे पक्ष एकजुटीने लढत आहेत. दुसरीकडे श्रीमंतांसोबत राहून जे अंधश्रद्धेसाठी लढत आहेत ते एकत्र लढत आहेत. हे लोक धर्माच्या आधारावर लढत आहेत."

"आमचा लढा गरिबांच्या बाजूने आहे. ज्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पदवी आणि डिप्लोमा करूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, पण त्या जागा भरायला केंद्र तयार नाही."

"इंडिया आघाडी बेरोजगारी आणि महागाईविरोधात लढत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ. प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. जर लोकशाही नसेल आणि हुकूमशाही असेल, तर तुम्ही कस मतदान कराल?" असं देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी