शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:34 IST

सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) या मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात करण्यात आलेले आंदोलन, विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्धभवलेली परिस्थिती तसेच विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करत आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशभरात खोटी माहिती देत लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असून या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. त्याचप्रमाणे सीएए आणि एनआरसी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक पक्षापाती व क्रूर होती असाही आरोप सोनिया गांधींनी केला आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 20 पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह देखील उपस्थित होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाjnu attackजेएनयूSharad Pawarशरद पवार