शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत आहे - राहुल गांधी

By admin | Updated: March 14, 2017 13:31 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपा दावा करत असलेल्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. 'गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाने किती लवकर निर्णय घेतला यापेक्षा किती पैसा ओतला हे महत्वाचं आहे', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी बोललेत की, 'पाचपैकी दोन राज्यांमध्ये भाजपाचा तर तीन राज्यांमध्ये आमचा विजय झाला आहे. आम्ही जिंकलेल्या राज्यांमध्ये पैसा आणि आर्थिक ताकदीचा वापर करत लोकशाहीला हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे'. 'आम्ही विरोधी पक्षात आहोत. प्रत्येकाला चढ उतार पाहावे लागतात, आम्ही मान्य करतो की उत्तप्रदेशात थोडा उतार पाहावा लागला', अशी कबुली राहुल गांधींनी दिली आहे.
 
यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे. गोव्यात राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असल्याने आम्हाला दावा करणं कठीण जाणार असल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
'भाजपाच्या विचारसरणीविरोधात आमचा लढा सुरु आहे. जे गोवा आणि मणिपूरमध्ये केलं जात आहे ती त्यांची विचारसरणी आहे, ज्याच्याविरोधात आम्ही लढा देत आहोत', असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.