शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:14 IST

Amit Shah News: ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम खराब असल्याचे बोलत नाहीत. विरोधकांना पराभव दिसू लागला की, ईव्हीएमवर प्रश्न विचारतात, असे टीका अमित शाह यांनी केली.

Amit Shah News: देशाने गेल्या तीस वर्षांतील अस्थिर सरकारमुळे खूप काही सहन केले. हा सर्वांत वाईट काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी चांगल्या प्रकारे सरकार चालवले. यूपीए सरकार आल्यावर भारत देश जगाच्या शर्यतीमध्ये मागे पडला. गेल्या १० वर्षांत देशाने स्थिर सरकार पाहिले आहे त्यामुळे आताही आपल्याला ४०० पार हवे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत सर्व जागा भाजपा जिंकणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. दिल्लीमध्ये स्वार्थासाठी युती केली आहे. ती आघाडी कोणत्या तत्त्वांवर आधारित असती तर ती संपूण देशभरामध्ये दिसली असती. पण हे काही ठिकाणी युती करत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांविरूद्धच लढत आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही

पुढे अमित शाह म्हणाले की, काँग्रेसला नेमके काय म्हणायचे ते समजत नाही. कारण ते कधी मतदानाच्या टक्केवारीवर तर कधी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित करतात. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या त्या ठिकाणी का नाही असा प्रश्न विचारला. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर हिमाचलमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले. तेलंगणामध्ये विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सरकार स्थापन केले. या राज्यांमध्ये जिंकल्यावर का ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे काँग्रसने का म्हटले नाही, असा खोचक सवाल करत, ज्या ठिकाणी ते जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम मशीन हे खराब असल्याचे बोलत नाहीत. मात्र त्यांचा पराभव झाला किंवा पराभव दिसू लागला की, ते ईव्हीएमच्या नावाने ओरडायला लागतात, या शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह टीव्ही ९ शी बोलत होते.

दरम्यान, हिमाचल प्रदेश असेल किंवा तेलंगणात असेल काँग्रेसने दिलेले एकही आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. राहुल गांधी यांची समस्या ही आहे की, ते अर्ध्या पानापेक्षा जास्त वाचू शकत नाहीत. अग्निवीरमधील असे आहे की, १०० पैकी २५ सैनिक कायमस्वरूपी होतील, बाकीच्यांना शासन, पोलीस दल  आणि इतर सवलती देण्यात येतील, असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गाधींना टोला लगावला.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन