शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:14 IST

Amit Shah News: ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम खराब असल्याचे बोलत नाहीत. विरोधकांना पराभव दिसू लागला की, ईव्हीएमवर प्रश्न विचारतात, असे टीका अमित शाह यांनी केली.

Amit Shah News: देशाने गेल्या तीस वर्षांतील अस्थिर सरकारमुळे खूप काही सहन केले. हा सर्वांत वाईट काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी चांगल्या प्रकारे सरकार चालवले. यूपीए सरकार आल्यावर भारत देश जगाच्या शर्यतीमध्ये मागे पडला. गेल्या १० वर्षांत देशाने स्थिर सरकार पाहिले आहे त्यामुळे आताही आपल्याला ४०० पार हवे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत सर्व जागा भाजपा जिंकणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. दिल्लीमध्ये स्वार्थासाठी युती केली आहे. ती आघाडी कोणत्या तत्त्वांवर आधारित असती तर ती संपूण देशभरामध्ये दिसली असती. पण हे काही ठिकाणी युती करत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांविरूद्धच लढत आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही

पुढे अमित शाह म्हणाले की, काँग्रेसला नेमके काय म्हणायचे ते समजत नाही. कारण ते कधी मतदानाच्या टक्केवारीवर तर कधी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित करतात. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या त्या ठिकाणी का नाही असा प्रश्न विचारला. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर हिमाचलमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले. तेलंगणामध्ये विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सरकार स्थापन केले. या राज्यांमध्ये जिंकल्यावर का ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे काँग्रसने का म्हटले नाही, असा खोचक सवाल करत, ज्या ठिकाणी ते जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम मशीन हे खराब असल्याचे बोलत नाहीत. मात्र त्यांचा पराभव झाला किंवा पराभव दिसू लागला की, ते ईव्हीएमच्या नावाने ओरडायला लागतात, या शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह टीव्ही ९ शी बोलत होते.

दरम्यान, हिमाचल प्रदेश असेल किंवा तेलंगणात असेल काँग्रेसने दिलेले एकही आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. राहुल गांधी यांची समस्या ही आहे की, ते अर्ध्या पानापेक्षा जास्त वाचू शकत नाहीत. अग्निवीरमधील असे आहे की, १०० पैकी २५ सैनिक कायमस्वरूपी होतील, बाकीच्यांना शासन, पोलीस दल  आणि इतर सवलती देण्यात येतील, असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गाधींना टोला लगावला.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन