शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:24 IST

उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे.

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारणात जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यातच, भाजपच्या ज्येष्ठ आणि फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे,' असे उमा भारती यांनी म्हटले आहे. 

यावेळी उमा भारती यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार अव्यवहार्य होते. कारण काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊच शकत नाही. ते एक सडलेले फळ होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. एवढा एकच त्यांचा हेतू होता. 

उमा भारती म्हणाल्या, 'ही बाळासाहेबांची शिवसेना बिल्कुल नव्हती, ही तर काँग्रेसची B टीम असलेली शिवसेना होती. हे सरकार नक्कीच पडायला हवे. कारण हे सरकार हिंदू विरोधी आणि महिला विरोधी सरकार आहे.' एवढेच नाही, तर उद्धव ठाकरेंवर निशाना साधत, या शिवसेनेने आपले नाव बदलून 'काँग्रेस सेना' ठेवायला हवे, असेही भारती यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस