शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री मातृत्वाच्या धंद्यावर बंदी घालणार

By admin | Updated: October 28, 2015 22:13 IST

निपुत्रिक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी विकसित झालेले भाडोत्री मातृत्वाचे (सरोगेट मदरहूड) वैद्यकीय तंत्राज्ञान फक्त भारतीयांनाच उपलब्ध व्हावे व विदेशी नागरिकांची मुले जन्माला

नवी दिल्ली : निपुत्रिक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी विकसित झालेले भाडोत्री मातृत्वाचे (सरोगेट मदरहूड) वैद्यकीय तंत्राज्ञान फक्त भारतीयांनाच उपलब्ध व्हावे व विदेशी नागरिकांची मुले जन्माला घालण्यासाठी भारतीय स्त्रियांनी आपली कूस भाडयाने देण्यावर कायद्याने पूर्णपणे बंदी घालण्याची आपली भूमिका आहे, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.भारतात भाडोत्री मातृत्वास व्यावसायिक स्वरूप येऊ नये यासाठी पहिले पाऊल म्हणून सरकारने मानवी भ्रुण आयात करण्यास पूर्णपणे बंदी लागू केली आहे व त्यासाठीची अधिसूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केली आहे, असे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी न्यायालयास सांगितले.आत्तापर्यंत भारतात फक्त वैद्यकीय संशोधनासाठी मानवी भ्रुण आयात करण्याची मुभा होती. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन देशात भाडोत्री मातृत्वाचा राजरोस धंदा फोफावला आहे. हजारो विदेशी नागरिक गरजू भारतीय महिलांची ‘कूस’ पैशाच्या आमिषाने भाड्याने घेऊन आपली अपत्ये त्यांच्याकरवी जन्माला घालत आहेत. कायद्याची बंधने नसल्याने व खर्च कमी असल्याने भारत हे ‘सरोगसी’साठी पसंतीचे ‘पर्यटनस्थळ’ झाले आहे. हा धंदा वर्षाला किमान ४४५ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यास आवर घालण्यासाठी सरकारला पावले उचलायला सांगावे व सुरुवातीला निदान मानवी भ्रुण आयातीस स्थगिती द्यावी, अशी याचिका जयश्री वाड या महिला वकिलाने केली आहे.न्या. रंजन गोगोई व न्या. एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठापुढे याआधी १५ आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने भाडोत्री मातृत्वाचे नियमन करण्यासाठी कायदा असायला हवा, असे केंद्र सरकारला स्पष्टपणे सांगितले होते. न्यायालय सॉलिसिटर जनरलना म्हणाले होते की, जोपर्यंत कायदा करीत नाही तोपर्यंत तुम्ही मानवी भ्रुणाच्या व्यापारास मुभा देऊ शकत नाही, हे अगदी उघड आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)