शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 5:14 PM

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.अशोक गेहलोत म्हणाले, कैलास मेघवाल यांनी यापूर्वी निवेदन दिले होते. राजस्थानात अशी परंपरा कधीच नव्हती. प्रत्येकाला ठाऊक आहे की, मी हे वारंवार पुन्हा पुन्हा बोलतो आहे. यापूर्वी सरकार पाडण्यासाठी दोन-तीन प्रयत्न झाले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून भैरोसिंग शेखावत साहेबांच्या काळात मी निषेध केला होता. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यानंतरही त्यांनी निषेध केला. त्यावेळी बळीराम भगत राजस्थानमध्ये होते. सीएम अशोक गहलोत म्हणाले की, मी राज्यपालांना भेटलो. राजस्थानमध्ये षडयंत्र रचण्याची आणि सरकार पाडण्याची परंपरा विकसित होऊ नये. भाजपाचे स्थानिक नेते मोठे दावे करीत होते, पण त्यांचा पर्दाफाश झाला आहे. आता भाजपाचे नेते चार्टर्ड प्लेनमधून आपल्या आमदारांना पाठवून कुंपण घालत आहेत. भाजपाची ही परंपरा लोकशाहीसाठी धोकादायक आहे.अशोक गेहलोत म्हणाले की, आमचा लढा सरकारला अस्थिर करण्याच्या कटाच्या विरोधात आहे. विजय फक्त आपलाच असेल. कारण राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. सरकार चांगले काम करीत आहे, कोरोनाविषयी चांगलं काम झालं आहे, राजस्थान आणि देश आणि जगभरात त्याची प्रशंसा होत आहे. जिथं जीव वाचवण्यासाठी संघर्ष असतो तिथे राजकारण मागे पडते. अशोक गहलोत म्हणाले की, दुर्दैवाने जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू असताना, (भाजपला) सरकारे पाडण्याचा कट रचण्यासाठी वेळ मिळाला. त्यांना कारभारात किती रस असेल याबद्दल आपण विचार करू शकता. त्यांना राज्य करण्यास किती रस असेल. दुर्दैवाने देशातील असे लोक सत्तेवर बसले आहेत. सीएम अशोक गेहलोत म्हणाले, मी पंतप्रधानांशीही बोललो. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी दिल्लीत तळ ठोकल्याच्या प्रश्नावर अशोक गहलोत म्हणाले की, मला काहीही माहीत नाही. म्हणजे भाजपमधील लोक देशात लोकशाही कमकुवत करीत आहेत. या देशातील जनता आणि राज्यातील जनता हे सहन करणार नाही.

हेही वाचा

CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलट