शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:02 IST

सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

इंदोर - सोशल मीडियात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजचा परिणाम लोकांच्या मनावर कितपत होतं याचं अजब प्रकरण मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये घडलं आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावांचे मृतदेह एका सरकारी आरोग्य केंद्रात रात्रभर मिठात दाबून ठेवण्यात आलं होतं. असं केल्याने ते मृत झालेले दोघं पुन्हा जीवित होतात असा संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून हा अंधविश्वासाचा खेळ रात्रभर खेळला गेला. 

मध्य प्रदेशातीलआरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांच्या मतदारसंघातील सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ कमलेश(20) आणि हरीश(18) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांना पाण्यातून बाहेर काढून सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत युवकांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा हवाला देत दोन्ही मृतदेह दोन क्विंटल जाड्या मिठामध्ये रात्रभर सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवलं. या मॅसेजमध्ये अशी अफवा पसरविण्यात आली होती की, कोणत्याही व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याच्या शरीराला जाड्या मिठाने झाकून ठेवा. असं केल्यास तो मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. मात्र चंद्रावती पोलिसांनी सांगितल्यानुसार सोमवारी या युवकांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करुन अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्यांचे अंत्यसंस्कार झाले आहेत. 

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन्ही मृतदेहांचे फोटोनंतर सार्वजनिक आरोग्य विभागावर प्रश्न उभे राहत आहेत. या घटनेवर आरोग्य अधिकारी प्रविण जडिया यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मला मिळाली आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या दबावामुळे डॉक्टरांना ही अंधश्रद्धेची घटना रोखता आली नाही. मात्र या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करु असं त्यांनी सांगितले आहे.  मात्र समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे अंधविश्वासाला खतपाणी दिलं जात आहे. सोशल मीडियातील व्हायरल मॅसेजवर लोकांनी कितपत विश्वास ठेवावा याची जनजागरुकता लोकांमध्ये होणं गरजेचे आहे.   

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्य