शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरवर हवा राजकीय तोडगा

By admin | Updated: August 21, 2016 03:46 IST

गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब

नवी दिल्ली : गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब चर्चा सुरू करावी, अशी विनंती काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शनिवारी केली. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रारही या नेत्यांनी केली. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. ए. मीर, माकपचे आमदार तारिगामी, अपक्ष आमदार हकीम यासीन व काँग्रेसचे अनेक आमदार होते. काश्मीरमधील जनतेशी केंद्र आणि राज्य सरकारचा संवाद पूर्णपणे तुटला असून, तो नव्याने सुरू करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रपतींना सांगितल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांना दिली. काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांद्वारे बळाचा वापर केला जात असून, त्यामुळे जनतेमध्ये संताप आहे. त्यातच पेट्रोलपासून अनेक जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्यामुळे जनतेचे हाल सुरू आहेत, असे ते म्हणाले (वृत्तसंस्था) अन्य भागांतही पसरतेय आंदोलनआतापर्यंत काश्मीरच्या खोऱ्यातच असलेले आंदोलन आता जम्मू आणि कारगिलच्या पीर पंजाल आणि चेनाबच्या खोऱ्यातही पसरत चालले आहे. या प्रकारे संपूर्ण जम्मू-काश्मिरात आंदोलन पसरले, तर स्थिती भयानकच होईल, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी लवकरात लवकर स्थिती सुधारण्यासाठी केंद्राला पावले उचलायला सांगावे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.काश्मीरमधील सर्व जनता अतिरेक्यांबरोबर आहे, असे समजणेच मुळात चुकीचे आहे, पण सरकारी यंत्रणा जनतेला फुटीरवादी समजून, त्यांच्याशी तसे वागत आहे आणि त्यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे, असा आरोप शिष्टमंडळातील नेत्यांनी केला. काश्मिरात ४३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतकाश्मीर खोऱ्यातील जनजीवन सलग ४३ व्या दिवशीही सुरळीत होऊ शकले नाही. श्रीनगर जिल्ह्यासह अनंतनाग आणि पम्पोर शहरांतील संचारबंदी शनिवारीही सुरू होती. खोऱ्यात आतापर्यंत ६४ लोकांचा बळी गेला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कार्यालये आज बंद होती, तर सरकारी कार्यालयांतही फारशी उपस्थिती नव्हती. सहा दिवसांच्या निर्बंधानंतर खोऱ्यात पोस्टपेड मोबाइल सेवा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. अफवा पसरू नयेत, यासाठी खोऱ्यातील मोबाइल सेवा बंद करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सर्व कंपन्यांची पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्री-पेड मोबाइलची आउटगोइंग सेवा सुरू झालेली नाही. शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा घणाघाती हल्ला गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे केला. हा शेजारी देश खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. तिरंगा रॅलीला संबोधित करताना ते येथे बोलत होते.