शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

काय सांगता? पोलीस करुन देणार मोबाईलचा रिचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:43 AM

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा युजर्सना रिचार्ज संपल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देपोलिसांना योग्य माहिती देणाऱ्या व्यक्तींना मोबाईलचा रिचार्ज करून देण्यात येणार आहे.जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी आग्रा पोलिसांच्या वतीने एक नंबरही जारी करण्यात आला आहे.9454458046 या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करुन नागरिक पोलिसांना योग्य माहिती देऊ शकतात.

आग्रा - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा युजर्सना रिचार्ज संपल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र कोणी जर पोलीस तुम्हाला मोबाईल रिचार्ज करून देतील असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांना हा मोबाईल रिचार्ज मिळणार आहे. 

पोलिसांना तक्रारीचे अनेक फोन येत असतात. पोलीसही सर्व प्रकरणाचा तपास करत असतात. अनेकदा तक्रारीसाठी येणारे फोन हे खोटे असतात. पोलिसांची दिशाभूल केली जात असल्याने यावर आता पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. योग्य माहिती देणाऱ्या नागरिकांना आग्रा पोलीस मोबाईल रिचार्च करून देणार आहेत. आग्राचे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी ही नवी युक्ती आणली आहे. यामध्ये पोलिसांना योग्य माहिती देणाऱ्या व्यक्तींना मोबाईलचा रिचार्ज करून देण्यात येणार आहे.

जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी आग्रा पोलिसांच्या वतीने एक नंबरही जारी करण्यात आला आहे. 9454458046 या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करुन नागरिक पोलिसांना योग्य माहिती देऊ शकतात. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरही त्याच्याशी संवाद साधू शकतात. पोलिसांना योग्य माहिती देऊन मदत करणाऱ्या नागरिकांना मोबाईलचा रिचार्ज करून दिला जाईल. 4S असं याला नाव देण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

4S मध्ये नागरिकांना विविध समस्या, तक्रारी, सुचना आणि तोडगा देता येणार असल्याची माहिती बबलू कुमार यांनी दिली आहे. पोलिसांना माहिती देणाऱ्यांना मोबाईल रिचार्जसोबतच पोलिसांकडून एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. यामुळे पोलीस आणि जनतेत सुसंवाद राहील. तसेच पोलिसांतचे नेटवर्क हे अधिक मजबूत होईल. पोलिसांना नागरिकांच्या समस्या जाणून घेता येतील. तसेच पोलीस आणि तक्रारीबाबत अनेकांच्या मनात भीती असते. मात्र 4S मुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होऊन ते पोलिसांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतील अशी माहिती बबलू कुमार यांनी दिली आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइल