शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
4
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
5
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
6
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
7
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
8
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
9
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
10
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
11
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
12
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
13
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
14
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
16
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
17
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
18
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
19
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
20
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
Daily Top 2Weekly Top 5

देशात ८ कोटीच गरीब; ६ वर्षांत झाली ७० टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 02:54 IST

शोधनिबंधात अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन : वेगवान विकासदर, ‘मनरेगा’, किसान योजना, स्वयंपाक गॅसवर अनुदान यांमुळे शक्य

नवी दिल्ली : भारतात २०११ ते २०१७ या सहा वर्षांत दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत घट होऊन ही संख्या २७ कोटींवरून कमी होऊन ८.१ कोटी झाली, असा दावा काही अर्ततज्ज्ञांनी एका शोधनिबंधात केला आहे. सुरजीत एस. भल्ला, अरविंद वीरमणी व करण भसिन या अर्थतज्ज्ञांनी ‘पॉव्हर्टी, इनइक्वालिटी अ‍ॅण्ड इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन इंडिया: २०११/१२-२०१७-१८’ या शीर्षकाचा शोधनिबंध अलिकडेच ‘नॅशनल कौन्सिल फॉर अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च’ संस्थेस सादर केला. या तिघांनी निष्कर्ष काढला की, दारिद्र्यरेषा ठरविण्याच्या तेंडुलकर सूत्रानुसार गरिबीचे प्रमाण २०११ मधील १४.९ टक्क्यांवरून २०१७ पर्यंत सात टक्के एवढे कमी झाले. देशातील गरिबी कमी होण्याचा आजवरचा हा सर्वात वेगवान काळ आहे.

जागतिक बँकेचा हवाला : जागतिक बँकेने भारताचे वर्गीकरण मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमध्ये केले आहे. त्यानुसार क्रयशक्तीची समानता राखून हिशेब केला तर भारतासाठी दारिद्र्यरेषा दरमहा २०० रुपये एवढ्या उत्पन्नाची ठरते. जागतिक बँकेनेही या सहा वर्षांत भारतातील गरिबी न भूतो अशा वेगाने कमी होऊन ५८ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर आल्याचे नमूद केले आहे.

शोधनिबंध म्हणतो की, या काळात अर्थव्यवस्थेने टिकवलेला वेगवान विकासदर व सरकारने राबविलेल्या ‘मनरेगा’, ‘डीबीटी’, पंतप्रधान किसान योजना, गॅसवरील अनुदान आदी योजनांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य निर्मूलन शक्य झाले. सरकारच्या या उपायांमुळे मोठ्या वर्गाच्या हाती अधिक क्रयशक्ती आली.

तेंडुलकर सूत्राखेरीज इतरही तीन पद्धतीने त्यांनी गरिबीमधील या घटीचे स्वतंत्र अंदाज काढले आहेत. इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार २०१७ मधील हे प्रमाण ७.४ टक्के व ३.४ टक्के तर राष्ट्रीय खतावणीमधील आकडेवारीनुसार ३.४ टक्के एवढे येते. यावरून सरकारच्या आर्थिक धोरणांचा लाभ तळागळापर्यंत झिरपल्याचे दिसते, असे या अर्थतज्ज्ञांना वाटते.
 

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत