शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

युवक आणि महिलांना मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:58 AM

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.

ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.साधारणत: २५ ते ३० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी, विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने अ‍ॅड. विलास लोणारी यांना उमेदवारी मिळाल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. पूर्वीच्या काळी कोणतीही निवडणूक असो कार्यकर्त्यांची फळी तयार असे. कोणत्याही कार्यकर्त्याला आमंत्रण द्यावे लागत नव्हते. सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून नाशिकमधून लोणारी निवडून आले होते. कारण कार्यकर्ते त्यांचा अथकपणे प्रचार करीत होते. आताच्या काळात मात्र बंडखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सर्व पक्षांत बंडखोरी करीत या पक्षातून त्या पक्षात उडी घेत आहेत. जसे काही वाहन बदलतात त्याप्रमाणे आजकाल लोक पक्ष बदलत आहेत. पूर्वीच्या काळी नेत्यांच्या शब्दांना मोल होते. वचनबद्धता पाळली जात असे. त्या काळात काँग्रेस पक्षाने अनेक महिलांना संधी दिली होती. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमदार म्हणून कार्य केले आहे. तसेच बीडमधून केशरबाई क्षीरसागर, दाभाडीतून पुष्पाताई हिरे, सिन्नरमधून वाजेताई, नाशिकमधून शोभा बच्छाव यांनी विधानसभेत आमदार व त्यानंतर मंत्रिपददेखील भूषविले आहे. मलादेखील नाशिकमध्ये उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपददेखील मी भूषविले आहे. पक्षातील आणि कार्यकर्त्यांच्या बळावर महिलांना आणि तरुणांना राजकारणात संधी मिळू शकते, हे मी अनुभवातून सांगते. फक्त त्यासाठी काम करण्याची जिद्द आणि संयम हवा.-सुमनताई बागले

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक