शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने घेतले दोन बळी

By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST

अवकाळी पावसाने घेतले दोन बळी

नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने दोन जणांचे बळी घेतले आहेत. या पावसाने द्राक्षबाग आणि अन्य पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील पावसाने विजेच्या गडगडाट व वादळासह हजेरी लावली. मालेगाव शहरातील गुलशन-ए-इब्राहीम येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने बालकाचा मृत्यू झाला. शेख इमरान शेख फिरोज (१४) रा. पाचवी गल्ली, गुलशेरनगर असे मृत बालकाचे नाव आहे. गेल्या २४ तासात वीज व वादळामुळे दोन बालकांनी जीव गमावला. अन्य घटना कळवण तालुक्यातील मानूर येथे घडली. अंगावर वीज कोसळल्याने शीतल अशोक हळदे (१८) या तरुणीचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बेमोसमी पावसाचा फटका सहन करावा लागत असल्याने बळीराजात चिंतेचे वातावरण आहे. दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर, मनमाड, भालूर, एकवई, धनेर, नवसारी, चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस झाला. पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.