शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली

By admin | Published: February 09, 2015 1:24 AM

मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली

मालेगाव : येथील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी फार्मसी महाविद्यालयाच्या समोरील मैदानात सुमारे २५ ते ३० मयत जनावरे फेकलेले मिळून आले. राज्यात प्रथमच अपघात तसेच साथीव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल केली जात असल्याच्या महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळाली आहे. शहराच्या आझादनगर भागात असलेल्या फार्मसी औषधशास्त्र महाविद्यालयाच्या समोरील बाजूस मोठे पटांगण आहे. या पटांगणाचा उपयोग मयत जनावरे फेकण्यासाठी केला जातो. अशा या जागेतून मोठी दुर्गंधी येत असल्याने परिसरातील रहिवाशांनी या भागात पाहणी केली असता त्यांना २५ ते ३० जनावरे मयत अवस्थेत आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेलेली जनावरे पाहून काही जागरूक नागरिकांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नागरिकांच्या म्हणण्यात तथ्य आढळून आले. ही जनावरे गुदमरून मेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, ती दोन ते तीन दिवसांपूर्वी मयत झाली असल्याने दुर्गंधी येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या जनावरांना ओवाडी नाला परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पुरण्यात आले. ही जनावरे कत्तलीसाठी शहरात आणण्यात आली होती. जनावरांची वाहतूक करताना गाडीत गुदमरून मृत्यु झाल्याने त्यांना रात्रीच्या अंधारात फेकण्यात आल्याचे समजते. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली जात असून, याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या येथील महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळते. शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये जनावरे भरून आणली जात असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो. पोलीस या आरोपाचे खंडन करीत असले तरी राज्यासह इतर राज्यांतून रोज मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. यातील काही जनावरे चोरी करून आणली जात असून, ही जनावरे निर्दयतेने कोंबल्याने गुदमरून मयत होतात. ही मयत जनावरे गुपचूप फेकून दिली जातात. यामुळे नेहमी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असली तरी यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. शहरात रोज सायंकाळी ते पहाटे यावेळेत नामपूर, सटाणा, कुसुंबा, दरेगाव, पवारवाडी, चंदनपुरी गेट या रस्त्यावरून जनावरांची वहातूक सुरु आहे. या प्रकारात सणाच्या काळात मोठी वाढ होेत असून, या काळात शहरातील जवळपास सर्वच रस्ते तसेच चौकात जनावरे बांधलेली असतात. या कत्तलीसाठी जनावरांची चोरी करण्यात येत असून, शेजारील जवळपास सर्व जिल्ह्यांतील पशुधनाच्या चोरीमुळे शेतकरी किंवा जनावरांचे मालक हवालदिल झाले आहेत. येथील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत जनावरांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, यातील जवळपास सर्व आरोपी अज्ञात आहेत.