शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीमुळे मतविभागणीचा बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:48 IST

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनांदगाव: निवडणूक राग-रंगहतबल भूमिपुत्र : अपक्ष उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरच ठरणार विजयाचे गणित

संजीव धामणेनांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.नांदगाव मतदारसंघात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने शिकून तिकडेच स्थलांतरित होण्याकडे तरुणांचा कल आहे. औद्योगिक रोजगाराच्या संधी नगण्यच आहेत. शेतीसिंचनाचा एखादा अपवाद वगळता नाव घेण्यासारखे प्रकल्प नाहीत. यंदाच्या मान्सूनमध्ये सगळीकडे महापूर आला असताना येथील नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. शेती हाच रोजंदारी मिळविण्याचा मार्ग असला तरी पाण्याचा स्रोत नसल्याने इतर तालुक्यांपेक्षा येथील शेती कष्टप्रद व कमी उत्पन्नाची आहे. नार-पार प्रकल्पाकडे डोळे लावून बसलेले मतदार, मनमाड तालुकानिर्मिती, उद्योग- रोजगाराची वानवा आदी प्रश्न येथे भेडसावत आहेत.पाण्याचा नसला तरी समस्यांचा पूर या मतदारसंघात आहे. निवडणुका जवळ आल्या की नांदगाव मतदारसंघ विक्रीला आहे, असा सूर भूमिपुत्रांकडून आळवला जातो; मात्र निवडणुकीत त्यांचे ध्रुवीकरण होऊन राजकारण फिरते. विद्यमान आमदार पंकज भुजबळ हे गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांसमोर कौल मागत आहेत. तर शिवसेनेकडून सुहास कांदे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे गावोगावी जाळे निर्माण झाले असले तरी, राष्टÑवादीनेही बºयापैकी हातपाय पसरले आहे. निवडणुकीत भुजबळ-कांदे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरी, भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांनीही आव्हान उभे केल्याने मतविभागणीचा धोका वाढला आहे. ही मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते हे येता काळच सांगेल. तिरंगी लढतीमुळे निवडणूक मात्र चुरशीची बनली आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देमनमाड व नांदगावचा पाणीप्रश्न, नार-पार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा.४व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत. औद्योगिक वसाहत, शेतीवर आधारित उद्योगनिर्मिती.४तालुक्यात रेल्वेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.निकराची लढत होण्याची चिन्हेमागील निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप व सेनेतील मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाला होता. यावेळी युती असूनही भाजपच्या रत्नाकर पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मतांची विभागणी अटळ आहे. भाजपचे माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ तिसऱ्यांदा नशीब आजमावत असले तरी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांचे पुन्हा एकदा कडवे आव्हान असल्याने लढत निकराची होणार आहे.बदललेली समीकरणेमनमाडच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे. गेल्यावेळी मनमाडचा पाणीप्रश्न ऐरणीवर होता. आज ८ ते १० दिवसांनी येणाºया पाण्यामुळे तो शिथिल झाला असला तरी करंजवणचे पाणी, हा मुद्दा पुढे आला आहे.प्रशासकीयदृष्ट्या वेगळा पडलेल्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे दु:खी असलेल्या मालेगाव जिल्हा परिषदेच्या अडीच गटातील मतदारांची ताकद यावेळी पक्ष की व्यक्ती यापैकी कुणाकडे झुकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.मागील निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले त्यावेळी दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजाराच्या वर मते घेतली होती. यंदा भाजप उमेदवार राष्टÑवादीच्या गोटात दाखल झाल्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला त्यांचे अधिकचे बळ वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगावPankaj Bhujbalपंकज भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना