शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बंडखोरीमुळे मतविभागणीचा बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:45 AM

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनांदगाव: निवडणूक राग-रंगहतबल भूमिपुत्र : अपक्ष उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरच ठरणार विजयाचे गणित

संजीव धामणेनांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.नांदगाव मतदारसंघात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने शिकून तिकडेच स्थलांतरित होण्याकडे तरुणांचा कल आहे. औद्योगिक रोजगाराच्या संधी नगण्यच आहेत. शेतीसिंचनाचा एखादा अपवाद वगळता नाव घेण्यासारखे प्रकल्प नाहीत. यंदाच्या मान्सूनमध्ये सगळीकडे महापूर आला असताना येथील नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. शेती हाच रोजंदारी मिळविण्याचा मार्ग असला तरी पाण्याचा स्रोत नसल्याने इतर तालुक्यांपेक्षा येथील शेती कष्टप्रद व कमी उत्पन्नाची आहे. नार-पार प्रकल्पाकडे डोळे लावून बसलेले मतदार, मनमाड तालुकानिर्मिती, उद्योग- रोजगाराची वानवा आदी प्रश्न येथे भेडसावत आहेत.पाण्याचा नसला तरी समस्यांचा पूर या मतदारसंघात आहे. निवडणुका जवळ आल्या की नांदगाव मतदारसंघ विक्रीला आहे, असा सूर भूमिपुत्रांकडून आळवला जातो; मात्र निवडणुकीत त्यांचे ध्रुवीकरण होऊन राजकारण फिरते. विद्यमान आमदार पंकज भुजबळ हे गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांसमोर कौल मागत आहेत. तर शिवसेनेकडून सुहास कांदे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे गावोगावी जाळे निर्माण झाले असले तरी, राष्टÑवादीनेही बºयापैकी हातपाय पसरले आहे. निवडणुकीत भुजबळ-कांदे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरी, भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांनीही आव्हान उभे केल्याने मतविभागणीचा धोका वाढला आहे. ही मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते हे येता काळच सांगेल. तिरंगी लढतीमुळे निवडणूक मात्र चुरशीची बनली आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देमनमाड व नांदगावचा पाणीप्रश्न, नार-पार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा.४व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत. औद्योगिक वसाहत, शेतीवर आधारित उद्योगनिर्मिती.४तालुक्यात रेल्वेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.निकराची लढत होण्याची चिन्हेमागील निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप व सेनेतील मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाला होता. यावेळी युती असूनही भाजपच्या रत्नाकर पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मतांची विभागणी अटळ आहे. भाजपचे माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ तिसऱ्यांदा नशीब आजमावत असले तरी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांचे पुन्हा एकदा कडवे आव्हान असल्याने लढत निकराची होणार आहे.बदललेली समीकरणेमनमाडच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे. गेल्यावेळी मनमाडचा पाणीप्रश्न ऐरणीवर होता. आज ८ ते १० दिवसांनी येणाºया पाण्यामुळे तो शिथिल झाला असला तरी करंजवणचे पाणी, हा मुद्दा पुढे आला आहे.प्रशासकीयदृष्ट्या वेगळा पडलेल्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे दु:खी असलेल्या मालेगाव जिल्हा परिषदेच्या अडीच गटातील मतदारांची ताकद यावेळी पक्ष की व्यक्ती यापैकी कुणाकडे झुकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.मागील निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले त्यावेळी दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजाराच्या वर मते घेतली होती. यंदा भाजप उमेदवार राष्टÑवादीच्या गोटात दाखल झाल्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला त्यांचे अधिकचे बळ वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगावPankaj Bhujbalपंकज भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना