शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:57 IST

कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

ठळक मुद्देसंरक्षण क्षेत्र : आधी काम नाही आता वेतनाचा प्रश्न

नाशिक : कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.नाशिककरांनी (कै.) यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून पाठविल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेचा भाग म्हणून संरक्षण खात्याच्या अखत्यारितील एचएएलचा कारखाना नाशिक जिल्ह्णातील ओझर येथे दिला. १९६४ साली झालेल्या या कारखान्याला मिग २१ विमाने बनविण्यासाठी परवाना देण्यात आला होता. या एका कारखान्यामुळे नाशिकमध्ये कारखानदारी आली आणि औद्योगिक क्रांती झाली. परंतु आता एचएएलच्या नाशिक विभागाची अवस्था बिकट झाली आहे. एचएएलमध्ये मिगचे काम संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर सुखोईची बांधणी आणि देखभाल दुरुस्तीचेदेखील काम सुरू आहे. मात्र ते संपल्यानंतर एचएएलकडे दुसरे काम नाही. पूर्वी सात ते आठ हजार कामगार असलेल्या या कारखान्यात आता साडेतीन हजार कामगार शिल्लक आहेत. नवीन विमानाचे काम सुरू करायचे असेल तर आता त्याची तयारी सुरू झाले तर काही वर्षांत पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ शकते. पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची एचएएलमध्ये निर्मिती होईल, असे सांगितले जात होते. मात्र केंद्रातील सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत ते खासगीकरणातून करण्यास दिले आणि एचएएलच्या भवितव्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी एचएएलला वाऱ्यावर सोडणार नाही असे अनेकदा सांगितले मात्र अद्याप नवीन काम सुरू झाले नाही.सध्या गाजत असलेला प्रश्न कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात असून, वेतनकराराचा कालावधी कमी करणे तसेच तसेच अपुरे वेतन असे अनेक मुद्दे आहेत. ऐन निवडणुकीत कामगारांनी संप केला असला तरी तो केवळ नाशिकमध्येच नाही तर एचएएलच्या सर्वच कंपन्यांमध्ये तो आहे. मात्र, यानिमित्ताने कामगार क्षेत्रातील अन्यायाचा मुद्दा मांडण्याची संधी विरोधकांनी सोडलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली दखल...एचएएलचा प्रश्न गंभीर असून, त्याचा एकूणच कामगार क्षेत्रावर परिणाम होऊ शकत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी कामगार संघटनेला भेट तर दिलीच; परंतु गोदाकाठी झालेल्या सभेत एचएएलचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक