शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

'नंबर गेम’साठी उत्तर महाराष्ट्रातच युतीत शह-काटशहचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:02 PM

३५ पैकी दहा जागांवर बंडखोरी, सेना-भाजपकडून बंडखोरांवर कारवाई नाही

संजय पाठक 

नाशिक : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतरदेखील उभय पक्षांत एकमेकाला शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक शहरातील ३६ नगरसेवक आणि साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिल्याने शिवसेनेचे भाजपच्या विरोधात बंड केल्याचे राज्यभर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, भाजपचेच अनेक ठिकाणी बंडखोर उभे असून, त्यामुळेच शिवसेनेने हे धाडस केल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी दहा जागांवर बंड असून त्यामुळे युतीचा ‘सामना’ कॉँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आपसातच होताना दिसत आहे.यंंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडे इच्छुकांची प्रचंड संख्या होती. कोणत्याही पक्षाची जागा बदलली गेली असती तर मित्रपक्षातील इच्छुकाकडून बंड अटळच होते. त्यामुळे युतीची घोषणा न करताना भाजप आणि शिवसेनेकडून थेट ए-बी फॉर्मचे वाटप करण्यात आले. परंतु त्यामुळे बंडखोरी टाळता आली नाही. या निवडणुकीत भाजपच्या वाटेला १६४ जागा आल्या असून, शिवसेनेच्या वाटेला १२४ जागा आल्या आहेत. तथाापि, विधानसभेत ‘नंबर गेम’साठी दोन्ही पक्षांचे अनेक बंडखोर उभे राहून आपसातच मित्रपक्षांचे ‘गेम’ करीत आहेत असे एकूणच राजकीय चित्र आहे.

उत्तर महाराष्ट्रात ३५ जागांपैकी दहा जागांवर बंडखोरी आहे. विशेष करून शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उभे आहेत. ज्या जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व गिरीश महाजन करतात त्यांच्या जिल्ह्यातच अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकमेकांसमोर उभे आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा येथे शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी, पारोळा मतदारसंघात शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, तर पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपच्या अमोल शिंदे यांनी शड्डू ठोकले आहेत. दुसरीकडे मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीदेखील बंडखोरी केली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना शिवसेनेची फूस असल्याची तक्रार आहे.

धुळे जिल्ह्यात यापेक्षा वेगळे चित्र नसून तेथेही युतीत बंडखोरी आहे. धुळे येथे शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या विरोधात भाजपचा थेट उमेदवार नाही. मात्र, अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या पाठीशी भाजप असल्याची शिवसेनेची तक्रार आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव-मनमाड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार यांचे पती रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली आहे, तर निफाड तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांच्या विरोधात त्यांचे पुतणे यतीन कदम हे अपक्ष उमेदवार असून, त्यांना भाजप आतून मदत करीत असल्याचा आरोप आहे. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली असून, त्यांच्यासाठी सर्व शिवसेना नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे सेना आणि भाजपने इशारे दिले परंतु बंडखोरांवर कारवाई मात्र केलेली नाही.

नाशिकमधील शिवसेनेच्या बंडानंतर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बंडखोरांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असती तर आधी धुळे, जळगाव, नाशिकमधील अन्य मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांना माघार घेण्यास सांगा, मग चर्चा करा अशी भूमिका घेण्याची शिवसेनेची तयारी होती. बहुधा त्यामुळेच भाजपने हा विषय बाजूला सारून सोबत आली तर शिवसेना अन्यथा शिवसेनेशिवाय प्रचार करण्याची भूमिका घेतली. या सर्व प्रकारांमुळे युतीशी लढाई ही कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी असण्यापेक्षा आपसातच होत आहेत की काय? असा प्रश्न आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019