पेठ तालुक्यात सोमवार (दि.६) रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना घडली. मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार नाशिक मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ननाशी, करंजाळी, आसरबारी परिसरात रात्र ...
जगात सर्वत्र ओमायक्रॉनची चर्चा सुरू असताना परदेशातून १२ जण मालेगाव शहरात परतले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सर्व जणांची मनपा आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्ट केली असून, त्यात कुणीही बाधित न आल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला आहे. दरम्यान, ...
नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला ...
राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे. ...
कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व कोविड केअर सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य प्रत्यक्षात रुग्णालयांना पोहोचलेच नसल्याच्या सदस्यांच्या तक्रारींची दखल घेत पुरवठादाराकडून एकूण खरेदी केलेल्या वस्तू व प्रत्यक्षात पोहोचलेल्या वस्तूंचे ऑडिट करण्य ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे, तसेच जिम्मी राजपूत या द ...
कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वत्र निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या ध्वजनिधी संकलनास नाशिककरांनी भरघोस योगदान दिले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले ...