“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 21:58 IST2026-05-14T21:52:57+5:302026-05-14T21:58:06+5:30
Congress MP Praniti Shinde Big Statement About Nitin Gadkari: सर्व खासदारांसाठी कायम नितीन गडकरी यांची दारे खुली असतात. विरोधकांची कामे मार्गी लावतात, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Congress MP Praniti Shinde Big Statement About Nitin Gadkari: सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो असे नेते म्हणजे नितीन गडकरी.नितीन गडकरी यांच्याकडे पक्षीय भेद नसतो. तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. आज जर तुम्ही मुख्यमंत्री असता, तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता, असे मोठे विधान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. सोलापूर येथे बोलताना प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव केले. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. तसेच सोलापूर दौऱ्यात २,७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे यांनी सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती केली. आपण हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण पाठवले. आजच्या परिस्थितीत जिथे विरोधकांना वैयक्तिक शत्रू म्हणले जाते, तिथे तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देता आणि आमची कामे मार्गी लावता, असे प्रणिती शिंदे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता
हे आमच्यासाठी नवल आहे आणि त्यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजूर दिली, त्यावेळेस मला असे वाटले की, तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्रात उणीव आहे. जर तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट झाली असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाला असते, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र पुढे गेला असता, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.
दरम्यान, स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न करत आहे. विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे, तो होऊ नये. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र, हे श्रेय माझे एकट्याच नाही, असंख्य इंजिनियर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे. २२ हजार कोटी खर्च करून बौद्ध सर्किट पूर्ण केले. बोधीवृक्षाखाली थांबलो होतो, त्यावेळी बोधी वृक्षाचे पान आधी माझ्या आणि त्यानंतर बायकोच्या खांद्यावर पडले. त्यावेळी भिक्षु म्हणाले की, गौतम बुद्धचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, अशी एक दिव्य आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.