शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवघे नगरजन आनंदे चिंब नहाले। विघ्नकर्तेच विघ्नहर्ते की हो जाहले।।

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

अवघे नगरजन आनंदे चिंब नहाले। विघ्नकर्तेच विघ्नहर्ते की हो जाहले।।

चला, एकूण जे झाले ते उत्तमच झाले. नाशिककरांचे भाग्य अचानक उजळून निघाले. ऋषि-मुनी आणि साधू-संत यांनी, त्यांच्या तपसामर्थ्याने दिलेल्या शापाचे उ:शापात रुपांतर झाले.‘कुंभ होणार नाही, होऊ दिला जाणार नाही’, या शापवाणीचा उच्चार कानी पडताक्षणी सारी जनस्थाननगरी भयकंपित होऊन उठली. धरणी दुभंगून गेली, (कोण म्हणते रे की धरणी शापवाणीने नव्हे, नगरपालिकेतील शापितांच्या करतुकीमुळे दुभंगली?) धरणी तर धरणी, पण आकाशही भयभीत झाले. या भयाचे अश्रुधारांमध्ये रुपांतर झाले आणि या धारांचा संततधार वर्षाव होऊ लागला! संततधारेने धरती शांत आणि सौम्य झाली, पण तिने ‘आपणासारखे करिती तत्काळ’ या संतवचनाचा आश्रय घेऊनच की काय, साधू-संतांच्या क्रोधाग्नीचेही बहुधा शीततम जलात रुपांतर केले. गेला तो काळ, जेव्हां साधू-संत आणि ऋषी-मुनी, स्वमग्नावस्थेत एकांतात दरीकंदरी ज्ञानोपासना करीत असत. समाजाशी, समाजातील घडामोडींशी, समाजातील सण-वार आणि व्रतवैकल्ये यांच्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध येत नसे वा ते तसा येऊही देत नसत. पण आता तसे राहिलेले नाही. साधू-संतांनाही या मृत्युलोकातील घडामोडींमध्ये कमालीचे स्वारस्य निर्माण झाले आहे. समाजाने आपला एक पाट सात ठिकाणी करावा, अशी आसक्ती त्यांच्या ठायी निर्माण झाली आहे. मान-अपमानाच्या जाणीवा आणि अपेक्षा यांनी तर केव्हांच त्यांच्यात शिरकाव करुन घेतला आहे. कालमानानुसार आता या साऱ्या कल्पना आणि त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या अपेक्षांनी त्यांच्यातील तामस गुण अधिकाधिक तप्त होत चालला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मग ती शापवाणी, ‘कुंभ होऊ देणार नाही’!पण व्यवहारात असं म्हणतात की, एकाने आग झाले तर दुसऱ्याने पाणी व्हावेच लागते. परमकृपाळु भगवंताच्या दयेने प्रशासनाने पाणी होणे पत्करले. साधू-संतांसाठी पायघड्या घातल्या. त्यांच्या एकूणच शरीर प्रकृतीला मानवेल, झेपेल आणि रुचेल असा त्यांचा पाहुणचार केला. या सेवेमुळे की काय, क्रोधाग्नी आणखीनच शांत झाला. पाणी होणे फळाला आले. उदईक प्रात:काळी गंगापूजनाचा मुहूर्त निश्चित झाला.गंगेकाठी समस्त साधूजन आणि ब्रह्मवृंद ब्राह्म मुहुर्तावर सज्ज झाले. गोरस, पुष्प-पत्री आणि गंधाक्षदांनी गोदेचे विधिवत पूजन केले गेले. गोरस प्रवाहित करण्याने आणि फुलं आणि पत्री जलार्पण करण्याने गोदा अधिकच प्रदूषित तर होणार नाही ना, अशी शंका काही पाखंडी लोकानी व्यक्त केली. पण तसे कसे होईल? साधूत्वाचा स्पर्श झालेल्या जिनसांनी असे थोडेच काही होत असते?साधू-संत उल्हसित तर प्रशासनासह अवघी नगरी उल्हसित. तसेच झाले. कुंभमेळ्याच्या घार्मिकतेला प्रारंभ झाला. गोदेचे पूजन करुन तिला नैवेद्य दाखविला गेला. कुंभाच्या मार्गातील साऱ्या विघ्नांचे हरण झाले, या समाधानात साऱ्या महानुभावांनी परतीचा मार्ग पत्करला.बिचारी गोदामाय मात्र विचारात पडली, अरे; कुणीही उठतो आणि येताजाता माझी पूजा का करतो बबड्यांनो? मी काय तुमच्या पूजेची भुकेली आणि पूजा करणाऱ्यांसारखी आसुसलेली आहे? या विचारात गुंग असतानाच, तिला खुदकन हसूही आले. रामकुंडाने भुवया उंचावून कारण विचारले. हसू दाबत माय म्हणाली, ‘हेच विघ्नकरते आणि हेच स्वयंघोषित विघ्नहर्ते. हसू नको तर काय करु’? (विशेष प्रतिनिधी)