शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना ठप्पं

By admin | Updated: April 30, 2017 00:25 IST

नायगाव : नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेचे दारणा नदीपात्रातील उद्भव ठिकाण कोरडेठाक झाल्याने योजनेचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे

 नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यास वरदान ठरलेल्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेचे दारणा नदीपात्रातील उद्भव ठिकाण कोरडेठाक झाल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे. नायगाव खोऱ्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.नायगाव खोऱ्यातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह व मोहदरी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेकदा विस्कळीत होत होता. याशिवाय मुख्य जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीचोरीमुळे ही योजना वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाऱ्यात असलेले योजनेचे उद्भव ठिकाणच कोरडे झाल्याने ही योजना संकटात सापडली आहे. त्यामुळे नायगाव खोऱ्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे. (वार्ताहर)