शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नाशकात गोदावरीचे गटारीकरण, जलचर, माणसांचे आरोग्य बिघडले

By अझहर शेख | Published: December 10, 2019 11:16 AM

नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.

- अझहर शेखनाशिक - शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र केवळ नावालाच असल्याने या नदीचे चक्क गटारीकरण झाले आहे. परिणामी, जलचरांसोबत माणसांचेही आरोग्य बिघडले असून, शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे.नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते, असा दावा पालिकेकडून केला जातो. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे गटारीकरण झाले आहे.गोदा प्रदूषणावर महापालिकेकडून उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दर २ महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावयाचा आहे.361 गावे गोदेवर अवलंबूननाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या तीन तालुक्यांमधील सुमारे ३६१ गावे गोदावरीच्या खोºयावर अवलंबून आहेत. गोदेच्या प्रदूषणाचा या सर्व गावांना फटका बसत आहे.डोळ्यांची जळजळ आणि दुर्गंधीनाशिक व मराठवाडा मिळून सुमारे ६६ लाख हेक्टरपैकी १६ टक्के शेती क्षेत्राला गोदेच्या पाण्याचा फायदा झाला आहे. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच गोदेकाठच्या नागरिकांना डोळ्यांची जळजळ, त्वचेला खाज सुटणे, डोकेदुखी, दुर्गंधी आदी आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. - देवांग जानी,अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती, नाशिक 

 

 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणgodavariगोदावरीNashikनाशिक