शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केळझर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:58 IST

शेतीसिंचन : राष्ट्रवादीचे जिल्हाधिका-यांना निवेदन

ठळक मुद्देकमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कंधाणे - बागलाण तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत असून यंदा कमी पावसामुळे चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून शेतीसिंचनासाठी अदयाप आरम नदीत पाण्याचे आवर्तन न सोडल्याने या भागातील फळ बागायती क्षेत्राच्या रब्बी हंगामाचे नियोजन चुकत आहे. त्यामुळे केळझर धरणातुन शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.बागलाण तालुक्यावर यंदा पावसाने वक्र दृष्टि केल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट कोसळले आहे. कमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आजही ब-याच गावांना एक दिवसाआड अपु-या स्वरूपात पाणी पुरवठा केला जात असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केळझर धरणाच्या लाभाक्षेत्रातील गावातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून धरणातील पाण्यावर कंधाणे, निकवेल, चौंधाणे, मुंजवाड, सटाणा, आराई गावातील फळबागायती शेतीक्षेत्राचे रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस शेतीसाठी पाण्याचे ठरणारे नियोजन यंदाच्या वर्षी उशिराने होत असल्याने बळीराजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून अदयाप कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे . शेतीसिंचनासाठी सोडण्यात येणा-या पाण्यामुळे शेतीसिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या केळझर धरणातून शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडून दुष्काळाने होरपळणाºया बळीराजाला दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदधिका-यांनी केली आहे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, विद्यार्थी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राजेंद्र सावकार उपस्थित होते

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी