शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे डेंग्यूवर मिळतेय नियंत्रण

By admin | Updated: December 17, 2014 00:31 IST

डासांची घनता कमी : आरोग्य विभागामार्फत मोहीम सुरूच

नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात थैमान घालणाऱ्या डेंग्यूच्या आजाराची तीव्रता आता कमी होत चालली असून, थंडीमुळे डासांची घनता कमी होऊन रुग्णसंख्येतही घट होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. शहरात जुलै-आॅगस्टपासून डेंग्यूच्या आजाराने थैमान घालत नाशिककरांची झोप उडविली. गेल्या चार महिन्यांत हजारांच्यावर रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले, तर ४३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डेंग्यूमुळे नगरसेवकाच्या पतीसह सात जणांचा बळीही गेला. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही डेंग्यूची तीव्रता लक्षात घेऊन शहरात एडीस डासांची अळी शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. शाळा, महाविद्यालये, वसतिगृह यासह घरोघरी जाऊन स्वच्छ पाण्याचे साठविलेले कंटेनर उलटे करण्यात आले, तर ठिकठिकाणी आढळून आलेल्या डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या. टायर्स जप्तीमोहीमही राबविण्यात आली. डेंग्यूची गंभीरता लक्षात घेता महापालिकेनेही विशेष महासभा बोलवत संबंधित विभागाला स्वच्छता मोहिमेसह उपाययोजनांचे आदेश दिले. आता गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, दोन दिवसांपासून तपमानाचा पारा ६.३ अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीमुळे डेंग्यूच्या डासांची घनताही ४.४ वरून ३.५ वर आल्याचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. दि. १ ते १६ डिसेंबर दरम्यान १२६ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील १०८ नमुने प्राप्त झाले असून, ५७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ४६ रुग्ण हे नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. थंडीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नैसर्गिकरीत्याच डेंग्यूवर नियंत्रण आले आहे. (प्रतिनिधी)