शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची चाहूल लागताच रब्बीच्या पेरण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:59 IST

खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्षी तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे गहू, हरभरा याबरोबरच उन्हाळ कांद्याची लागवड करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्षी तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा याबरोबरच उन्हाळ कांद्याची लागवड करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.
जोरदार पावसामुळे यावर्षी खरिपाचे पीकही जोमात होते. उत्पन्न दृष्टिक्षेपात आल्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतातच मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीने हतबल झालेला बळीराजा आले ते उत्पन्न पदरात पाडून घेत रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. ज्यांचे शेत तयार झाले त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. बहुसंख्य शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करीत आहेत.
जानेवारीत उळे तयार झाल्यानंतर उन्हाळ कांद्याची लागवड सुरू होईल. ज्यांच्याकडे उळे शिल्लक आहे, असे शेतकरी कांदा लागवडीला सुरुवात करतील. अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामानंतर शेत स्वच्छ करण्यात आले. विहिरीला पाणी असल्याने गव्हाची पेरणी केली जात आहे. खरीप हंगाम वाया गेला, तरी रब्बी हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया खमताणे येथील शेतकरी उमेश खैरनार यांनी दिली.आठवडाभरात पेरण्यांच्या कामांना वेग येईल. कांद्याला सध्या मिळत असलेला दर पाहता यावर्षी उन्हाळा कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता आहे. अतिपावसामुळे कांद्याच्या उळ्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा बियाणे टाकून कांदा रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :kalwan-acकळवणFarmerशेतकरी