शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

By admin | Updated: August 25, 2016 00:46 IST

पुणेगाव दरसवाडी पोहोच कालवा : उपचार घेण्यास नकार

पाटोदा : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी कातरणी येथील कालव्यावर सुरु असलेले उपोषणा दुसऱ्या दिवशी सुरूच असुन यातील चार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असुन त्यांना पुढील उपचारासाठी येवला येथील शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी उपचार करून घेण्यास विरोध दर्शविला असुन जोपर्यंत पुणेगावचे पाणी दरसवाडीत व दरसवाडीचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे बाळापुर पर्यंत सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असुन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. या उपोषणास सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून शिवसेना नेते संभाजी पवार, साहेबराव सैद पाटील, देवचंद गायकवाड, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष वाल्मिक गोरे ,धोंडीराम कदम ,अशोक गायकवाड, संदीप शिंदे ,अरु ण शेलार , साहेबराव आहेर, शेतकरी संघटना अध्यक्ष संतू पा झांबरे, जि प सदस्य प्रवीण गायकवाड, रमेश कोल्हे, चांदवड पुणेगाव कृती समिती अध्यक्ष तुकाराम सोनवणे, अरु ण शिरसाठ ,प्रभाकर बोरणारे, कृ.उ.बा.संचालक संजय बनकर, चांदवड तालुक्यातील पाटपाणी लाभक्षेत्रातील अनेक शेतकरी यांनी या उपोषणास सशर्त पाठींबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संभाजी पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पुणेगाव दरसवाडी पोच कालव्यासाठी आता प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा सर्वानीच हे आंदोलन अजून तीव्र कसे करता येईल व त्यातून सर्वाना जिव्हाळ्याचा वाटत असलेला हा प्रश्न मार्गी कसा लागेल ? यासाठी या उपोषणास सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.दरम्यान कालवाप्रशनी उपोषणास बसलेले सुमनबाई कदम,सोपान पगार,श्रावण वाघमोडे,व मोहन शेलार आदि उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असुन यातील तिघांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असुन मोहन शेलार यांनी जोपर्यंत कालव्यास चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच असुन कोणत्याही प्रकारचे उपचार घेणार नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)