शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शहराने पांघरली धुक्याची दुलई

By admin | Updated: September 27, 2015 00:23 IST

वातावरणात बदल : पावसाने पुन्हा घेतली विश्रांती

नाशिक : गणेश चतुर्थीनंतर शहरात सुरू झालेल्या पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून, सध्या पहाटेच्या सुमारास शहर धुक्याची दुलई पांघरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. धुक्यात हरविलेले शहर साडेसहा वाजताच सूर्यकिरणांनी उजळून निघत असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे.शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे शहराच्या विविध उपनगरांमध्ये दाट धुके व दवबिंंदू पडत आहे. अवघ्या अर्धा तास दाट धुके नागरिकांना पहावयास मिळते. पहाटेची झुंजूमुंजू होताच धुके हटू लागते आणि सूर्याची किरणे हळुवारपणे दाटलेल्या धुक्यातून शहरावर पडत आहेत; मात्र आठ वाजताच सूर्याची किरणे तीव्र होत असून, प्रखर ऊन नाशिकरांना गेल्या तीन दिवसांपासून जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचे प्रमाणही शहरात कमी झाले असून, एकूणच ‘आक्टोबर हीट’ची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे. भाद्रपद महिन्याचा दुसरा आठवडा संपला असल्याने हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे चिन्ह शहरात दिसत आहे. तसेच नऊ वाजेनंतर वातावरणात काही प्रमाणात गारवाही जाणवत असल्याने दुचाकीवरून प्रवास करताना नाशिककरांना थंडी भरत आहे, तर रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंड हवेची मंद झुळूक आल्हाददायक वातावरणाची अनुभूती करून देणारी ठरत आहे. एकूणच निसर्गाच्या बदलत्या हवामान चक्रामुळे सध्या नाशिककरांना आगळा वेगळा वातावरण अनुभवयास मिळत आहे. दिवसाच्या बदलत्या प्रहरानुसार वातावरणाची लयदेखील बदलत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पहाटे धुके , दुपारी ऊन, संध्याकाळी गारवा, रात्री थंडी असे वातावरण सध्या शहरात अनुभवयास येत आहे. (प्रतिनिधी)