शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:19 IST

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषीपदवी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (दि.३) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषीपदवी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (दि.३) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.नाशिक जिल्ह्यातून सुमारे २२ हजार ४०४ विद्यार्थी सीईटीसाठी प्रविष्ट झाले होते. तर विभागातून ४९ हजार ६०६ विद्यार्थ्यांंनी ही परीक्षा दिली होती. यात नाशिकच्या प्रथमेश फडके याने १७४ गुण मिळवले असून, मृणाल कोतकर (१७३), निसर्ग धामणे (१७०), निरज पंडित (१७०), सिद्धार्थ चोरडिया (१६५), भूपाली कमलास्कर (१६४), आदित्य मेधने (१५९), श्रृत कासलीवाल (१५९), गुंजन गुजराथी (१५९), धनंजय होके (१५६) ध्यानी व्यास (१५४), तेजस बनकर (१५३), अदित पाटील (१५२) प्रत्येंच्छा कुराडेने १५२ गुण मिळवले आहे. यावर्षीच्या एमएचसीईटीमध्ये अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना ही परीक्षा अधिक कठीण गेल्याने निकालात घसरण झाली असल्याचे बोलले जात आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्व लक्ष ‘नीट’वर केंद्रित केले होते. त्यामुळेही एमएचसीईटीच्या निकालात घट झाल्याचे मत दुसºया गटातून व्यक्त होत आहे. एमएचसीईटीसाठी निगेटीव्ह मार्किंग नसतानाही संपूर्ण राज्यातून परीक्षेस प्रविष्ट ४ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ हजार विद्यार्थ्यांना १०० पेक्षा अधिक गुण मिळाले असल्याने जेईईच्या तुलनेत सीईटीचा निकाल खालावला असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी क्षेत्रातील ८५ टक्के जागा या सीईटीमार्फत भरल्या जाणार असून १५ टक्के जागा जेईई परीक्षेतील गुणांच्या आधारे पूर्ण करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांची लागली कसोटीफिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स (पीसीएम) आणि बायोलॉजी (पीसीबी) या दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. अकरावी व बारावी अभ्यासक्र मावर आधारित या परीक्षेची काठिण्य पातळी वाढल्याचे निकालाअंती दिसून आले. मॅथ्स व बायोलॉजी या विषयांच्या तुलनेत फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांवरील बहुतांश प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने हा पेपर सोडवताना परीक्षार्थींची मोठी कसोटी लागली होती.

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी