शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

५० वर्ष जुन्या इमारतीचे आॅडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:28 AM

राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, अशा इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सभासदांनी वार्षिक सभेच्या माध्यमातून केली आहे.

नाशिक : राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, अशा इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सभासदांनी वार्षिक सभेच्या माध्यमातून केली आहे. तसेच आरटीई कायद्यानुसार सर्व खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारकात महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यासपीठावर केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा महामंडळाचे नाशिक विभाग अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, एस. टी. सुकरे, एस. पी. जवळकर,जयवंत ठाकरे, किरण सरनाईक, मारुती म्हात्रे, विनय राऊत मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगतात विजय नवल पाटील यांनी खासगी अनुदानित शाळांविषयी सरकारच्या अनास्थेवर बोट ठेवतानाच शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थांना वेतनेतर अनुदान मिळालेले नसल्याचे नमूद केले. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने १२ टक्के शिक्षणेतर अनुदान देण्याचा निर्णय दिला असतानाही सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे शासकीय शाळांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी सरकारडून निधी उपलब्ध होतो. तर खासगी शाळांच्या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या असतानाही सरकारकडून त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या शाळांची दुरवस्था झाली आहे. अशा ५० वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या जागेवर नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव यावेळी सर्वमताने करण्यात आला. दरम्यान, मागील सभेचे इतिवृत्त एकमताने मंजूर करून सभासदांनी माडलेले विविध ठराव सभासदांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनेच्या प्रशिक्षणास संस्थांचा सहभाग, विविध न्यायालयांमध्ये सरकारविरोधात महामंडळाने केलेल्या याचिका, महामंडळासाठी अनुदान व देणग्या स्वीकारणे कर्ज उभारणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.खासगी अनुदानित शाळांविषयी सरकारच्या अनास्थेवर बोट ठेवतानाच शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थांना वेतनेतर अनुदान मिळालेले नसल्याचे नमूद केले. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने १२ टक्के शिक्षणेतर अनुदान देण्याचा निर्णय दिला असतानाही सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र