शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारात द्राक्षांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच ...

नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांचे आगमन झाले असून द्राक्षांना मागणी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांनाही हा हंगाम अधिक उत्पन्न मिळवून देण्याची अपेक्षा आहे. सध्या बाजारात द्राक्षाला प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. मात्र, थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील काळात वाढत्या उष्णतेसोबतच द्राक्षांच्या साखरेत आणि भावातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्हे द्राक्ष उत्पादनाचे मुख्य जिल्हे आहेत. त्यातही नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची सर्वाधिक निर्यात युरोपियन देशांमध्ये होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिपावसाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला होता. तर २०२० मध्ये अवकाळी पावसाचा द्राक्षांना फटका बसला होता. अशा कठिण परिस्थितीचा सामना केल्यानंतर यावर्षी द्राक्षांना युरोपसह विदेशात चांगली मागणी असताना स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांना चांगला दर मिळत आहे. सध्या बाजारपेठेत प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत निर्यातीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांचे भाव वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत साखरभरणी होऊन निर्यातीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे पुढील काळात द्राक्षांना चांगले दर मिळण्याची आशा आहे.

-मदन पिंगळे , द्राक्ष उत्पादक शेतकरी

इन्फो -

आरोग्यासाठी द्राक्षे फायदेशीर

द्राक्षे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर असून ते शरीराला बर्‍याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते.

(फोटो- ०२पीएचएफबी८४, ८५, ८६)