शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज अन् मदतीबाबत शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगाचा पोशिंदा म्हणून गौरव केला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व अडचणींवर मात ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगाचा पोशिंदा म्हणून गौरव केला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व अडचणींवर मात करण्यासाठी सरकारतर्फे सहानुभूतीच्या अनेक घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी गांभीर्याने होत नाही. त्यामुळे असंख्य शेतकरी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपासून लांबच राहतात. काही घोषणा तांत्रिक अडचणीत हवेतच विरतात. तर काही योजनांची अंमलबजावणी थोडीफार होते आणि थांबते. त्यामुळे बहुतांश शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेतच असतात. अशा शासन आणि प्रशासनाच्या बेपर्वाईच्या भूमिकेमुळे शेतकरी केवळ सरकारी घोषणांच्या अंमलबजावणीकडे आस लावून बसले आहेत. जिल्ह्यातील शेतकºयांची अवस्थादेखील नेमकी अशीच झाली आहे. त्यामुळे शेतकºयांची ही चेष्टा आता थांबली पाहिजे आणि योजनांची गांभीर्याने अंमलबजावणी झाली पाहिजे अन्यथा पोकळ घोषणाच शासनाने बंद कराव्या, असा संतापाचा सूर शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.राज्य शासन सत्तेवर आल्या आल्या कर्जमाफीची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. काही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झाली. पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र आचारसंहितेच्या कारणाने आणि आता कोरोनाच्या कारणाने लांबली. कर्जमाफी मिळणार या आशेवर शेतकºयांनी कर्ज भरले नाही. पण कर्ज न भरल्याने आता खरीप हंगामासाठी शेतकºयांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या असताना प्रशासन आणि सरकार केवळ बैठका घेऊन बँक प्रशासनाला दम भरते आहे. पण आर्थिक व्यवहाराचा प्रश्न असल्याने बँका प्रशासन आणि सरकारचे ऐकायला तयार नाहीत. गेल्या महिन्यात स्वत: सहकार मंत्र्यांनी बँकांना कर्जमाफीतील पात्र शेतकºयांना कर्ज देण्याचा आदेश काढला. हा आदेश राष्टÑीयकृत बँकांना लागू नाही म्हणून त्या बँकांनी झुगारला. तर जिल्हा बँकांनी सुरुवातीला दखल घेतल्याचे भासवले नंतर त्याकडे वेगवेगळे कारणे पुढे करीत दुर्लक्ष केले. अंमलबजावणी न झाल्याने शेतकºयांच्या तक्रारी वाढत गेल्या. त्यावर ८ जूनला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘शेतकºयांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे’ असे वक्तव्य करून बँक आणि प्रशासनाला दम भरला. त्यावर जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाºयांची बैठक घेऊन सूचना केल्या. पीक कर्जासाठी गावोगावी मेळावे घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले. पण हे सर्व कागदावरच राहिले. पीक कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या एकाही शेतकºयाला कर्ज मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जिल्हा बँकेने शिखर बँकेकडे शेतकºयांना कर्ज देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ९० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. राष्टÑीयकृत बँका मात्र रिझर्व्ह बँकेच्या आदेशाशिवाय कार्यवाहीला तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेशी चर्चा केली असली तरी अधिकृत आदेश नसल्याने शेतकºयांना अद्यापही कर्ज मिळालेले नाही.जिल्ह्यात पीक कर्जमाफीला पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या २७ हजारापेक्षा अधिक आहे. त्यातील ज्यांना शक्य त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून कर्ज भरले आणि नवीन कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. परंतु ७५ टक्केपेक्षा अधिक शेतकरी मात्र अजूनही सरकारी कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याने मान्सूनला सुरुवात झाली असूनही खरीपाच्या तयारीला सुरुवात केलेली नाही. एकीकडे कोरोनाच्या वातावरणात सर्वत्र नैराश्याचे सूर असताना दुसरीकडे मात्र खरीप हंगामही घेता येणार नाही याचे मोठे संकट शेतकºयांपुढे आहे.केवळ कर्जमाफीच नाही तर गेल्या तीन वर्षातील चित्र पाहिल्यास नंदुरबार जिल्ह्यात शेतकºयांवर अनेक संकटे आली. विशेषत: कापसाचा बोंडअळीचा प्रश्न गंभीर होता. त्यावर शासनाने मदत जाहीर केली पण ही मदत निम्म्या शेतकºयांना मिळाली. तर असंख्य शेतकरी अजूनही त्याच्या प्रतीक्षेत आहेत. टप्प्याटप्प्याने येणाºया अनुदानाचे नियोजनपूर्वक वाटप न झाल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. एकीकडे अनुदानच न मिळाल्याची तक्रार असताना दुसरीकडे प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे एकाचे अनुदान दुसºयाच्या खात्यावर जमा होण्याचे प्रकारही वाढले. अशा शेतकºयांच्या तक्रारीनंतर ज्या शेतकºयांच्या खात्यात चुकीने अनुदान गेले त्यांच्याकडून रक्कम काढून घेण्यात आली पण ज्याला दिली गेली नाही ते शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. कृषी सन्मान योजना पात्र असूनही अनेक शेतकरी वंचित आहेत. पात्र शेतकºयांना अनुदान मिळते पण त्यात सुसूत्रता नाही. असे प्रकार शेतकºयांच्या योजनांबाबत सातत्याने घडत आहेत. त्यामुळे योजनांसाठी पात्र असूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असून केवळ आशेवरच दिवस घालवीत आहेत. एकूणच अशा प्रकारामुळे शेतकºयांची चेष्टा सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता तरी गंभीर होण्याची गरज आहे.